शरद पवारांची साथ सोडल्यानंतर राखी जाधव पहिल्यांदा बोलल्या, म्हणाल्या 'नेता दुर्लक्षित करतो तेव्हा...',

Last Updated:

पुण्यात प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर राखी जाधव यांचा राजीनामा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातो.

News18
News18
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाची कमान एकहाती सांभाळणाऱ्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या तिकीटवाटपाच्या बोलणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार गटाच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राखी जाधव यांचा पक्ष प्रवेश हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातो. पुण्यात प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर राखी जाधव यांचा राजीनामा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातो. आमदार पराग शाह यांच्या उपस्थितीत राखी जाधव यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) शरद पवार गटाने ठाकरे बंधूंशी युती केली आहे. मात्र जागावाटपावरून झालेल्या नाराजीनाट्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. राखी जाधव यांनी या निवडणुकीत 52 जागांच्या उमेदवारांची यादी पक्षाकडे दिली होती. युती किंवा आघाडीत पक्षाला कमी जागा मिळत असल्याने त्या नाराज होत्या. यासंदर्भात बोलून देखील वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले नाही अशी त्यांची नाराजी आहे. घाटकोपरमधून राखी जाधव यांना भाजपकडून महापालिकेची उमेदवारी मिळाली आहे.
advertisement

पक्ष सोडल्यानंतर राखी जाधव यांची पहिली प्रतिक्रिया

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राखी जाधव यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत राजीनामा दिल्याचे कारण सांगितले आहे. राखी जाधव म्हणाल्या, मतदारसंघातील विकासासाठी हा निर्णय घेतला जो विकास मुंबईत होतोय असाच विकास घाटकोपर मध्ये व्हावा म्हणून प्रवेश केला आहे. पराग शहांसोबत संघटित व्हावं असं वाटलं कारण आपण राजकारण विकासासाठी करत आहे. अपेक्षित कामे व्हावीत म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.
advertisement

शरद पवारांची साथ राखी जाधव यांनी का सोडली? 

भाजपच्या माध्यमातून होणाऱ्या विकासात सहभागी होण्यासाठी निर्णय घेतला आहे. कार्यकर्ता नेत्याकडे व्यक्त होतो. मात्र नेता दुर्लक्षित करतो तेव्हा लक्षात येतं की चुकतंय, असे म्हणत राखी जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे.

प्रविण दरेकर काय म्हणाले?

राखी जाधव यांच्या उमेदवारीवर प्रविण दरेकर म्हणाले, उमेदवारीसाठी कुणी येत नाही, विकासाचे राजकारण पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस करतात. राखी जाधव जमिनीवरील कार्यकर्ता आहे. विकास करायचा असेल तर देवेंद्रजीसोबत काम करावं असं त्यांना वाटलं . शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा राखी जाधव यांनी प्रवेश केला. ज्या पक्षात चांगले लोक आहेत ते भाजपत येत आहे. मोदी, फडणवीस आणि राष्ट्रभक्तीवर विश्वास आहे ते भाजपत येत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
शरद पवारांची साथ सोडल्यानंतर राखी जाधव पहिल्यांदा बोलल्या, म्हणाल्या 'नेता दुर्लक्षित करतो तेव्हा...',
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement