advertisement

PM Modi Speech: परिस्थिती चिंताजनक, कोरोना सारखं लढावं लागणार, पीएम मोदी लोकसभेत काय म्हणाले?

Last Updated:

PM Modi in Lok Sabha: होर्मुझ सामुद्रधुनीतून जलवाहतूक बंद असल्याचे भारताला होणारा एलपीजी, इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. या सगळ्या घडामोडीत पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन सादर केले.

परिस्थिती चिंताजनक, कोरोना सारखं लढावं लागणार, पीएम मोदी लोकसभेत काय म्हणाले?
परिस्थिती चिंताजनक, कोरोना सारखं लढावं लागणार, पीएम मोदी लोकसभेत काय म्हणाले?
नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जगभरात इंधन संकट घोंगावू लागले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जलवाहतूक बंद असल्याचे भारताला होणारा एलपीजी, इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सगळ्या घडामोडीत पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन सादर केले. युद्धाचे दीर्घकालीन परिणाम होणार असून कोरोना काळातील संकटासारखं लढावं लागणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
पश्चिम आशियातील युद्धाबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत सांगितले की, तेथील सद्यस्थिती ही चिंतेचा विषय आहे. देशाला इंधन (तेल आणि वायू) संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने, आता इंधनाची आयात ४१ देशांतून केली जात आहे; यापूर्वी ही आयात केवळ २७ देशांतून केली जात असे.
हे संकट आता तीन आठवड्यांहून अधिक काळापासून सुरू आहे. या संकटावर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या दिशेने सर्व संबंधित पक्षांनी काम करावे, असे आवाहन संपूर्ण जागतिक समुदाय करत आहे. पश्चिम आशियामध्ये एक कोटी (दहा दशलक्ष) भारतीय वास्तव्यास आहेत. तिथे राहणाऱ्या भारतीयांना आवश्यक ती मदत आपल्या राजनैतिक दूतावासांमार्फत पुरवली जात आहे. आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि इतर देशांमध्ये २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत.
advertisement

एलपीजीचं उत्पादन वाढवण्यावर भर....

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एलपीजीच्या (LPG) देशांतर्गत वापराला प्राधान्य दिले जात आहे, त्याच वेळी देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावरही भर दिला जात आहे. भारताने आपल्या ऊर्जा आयातीमध्ये विविधता आणली आहे; आज भारत ४१ वेगवेगळ्या देशांकडून ऊर्जेची आयात करतो. सध्या भारताकडे ५.३ दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक कच्च्या तेलाचा (क्रूड ऑइल) सामरिक साठा उपलब्ध आहे आणि ६.५ दशलक्ष मेट्रिक टनाचा साठा निर्माण करण्याचे काम सुरू आहे."
advertisement

कोरोना काळासारखं संकट...

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोरही अभूतपूर्व आव्हाने उभी राहिली आहेत. ही आव्हाने आर्थिक स्वरूपाची आहेत, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत आणि ती मानवतावादी स्वरूपाचीही आहेत. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, युद्धाचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. कोरोना काळातील संकटाचा मुकाबला केला, तसाच मुकाबला आता करण्याची आवश्यकता आहे. युद्धामुळे निर्माण झालेल्या या संकटाला आपल्याला शांतपणे, संयमाने आणि एकजुटीने तोंड द्यायचं असल्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
view comments
मराठी बातम्या/देश/
PM Modi Speech: परिस्थिती चिंताजनक, कोरोना सारखं लढावं लागणार, पीएम मोदी लोकसभेत काय म्हणाले?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement