अमरावतीमधील शेतकऱ्याचा प्रयोग, घरच्या घरी तयार केले कीटकनाशक, असा होतो शेतीला फायदा
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अमरावतीमधील शेतकऱ्याने नवीन प्रयोग करून बघितला. त्यामुळे त्यांना आता शेतीसाठी अनेक फायदे होत आहे.
advertisement
advertisement
शेतकरी रविंद्र मेटकर यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, सध्या प्रधानमंत्र्यांचा कल विषमुक्त अन्न आणि सेंद्रिय शेती वाढवण्याकडे आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहे. मी गेले 5 ते 6 वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहे. त्यात मी एक प्रयोग करून बघितला. त्याला पंच्यामृत असे नाव दिले.
advertisement
शेतात कीटक आणि जंगली प्राणी जास्त जोर करतात. त्याला आळा घालण्यासाठी ताक, अंडी, चुना, तुरटी आणि गूळ हे पदार्थ प्रमाणात घेऊन एकत्र करून त्याचे मिश्रण तयार केले. ते मिश्रण एका ड्रामात मशीनने फिरवून घेतले. ते योग्य प्रमाणात घेऊन त्याची सर्व पिकांवर फवारणी केली. पिकांवर 4 फवारणी केल्यास त्याचा नक्की फायदा होतो.
advertisement
advertisement
advertisement









