फक्त एका शेती नको, जोडधंदाही करा; शेतकऱ्याने गायी घेतल्या आता महिन्याला लाखांची कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या बाळासाहेबांनी नोकरीच्या मागे न धावता दुग्ध व्यवसायात नशीब आजमावले आहे. या व्यवसायातून महिन्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतात. सोलापूर जिल्ह्यातील पेणूरच्या बाळासाहेब महादेव रणदिवे यांनी असाच व्यवसाय केला आहे. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या बाळासाहेबांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायात नशीब आजमावले आहे. या व्यवसायातून महिन्याला एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहेत.
advertisement
advertisement
त्यांच्या गायींपासून दररोज सकाळ आणि संध्याकाळ मिळून 200 लिटर दुधाचे उत्पादन होते. तीन महिन्यांनी पशुवैद्यकांना गोठ्यावर बोलावून गायींची तपासणी केली जाते. तसेच आवश्यक लसीकरणही केले जाते. गायींना दिवसातून दोन वेळा चारा आणि योग्य खुराक दिला जातो. गोठ्याची नियमित स्वच्छता आणि जनावरांची विशेष काळजी घेतली जाते.
advertisement
advertisement







