Success Story : पोलीस भरतीत संधी हुकली, पाटील शेताकडे वळले, आता 2 लाखांची कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पुणे-मुंबईत जाऊन वर्षभर नोकरीचा शोध घेतला, परंतु पाहिजे तशी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे शेवटी थेट गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
सीताराम पाटील यांनी एम.कॉमपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर खाकी वर्दीचं स्वप्न पाहून पोलीस भरतीची तयारी केली. परंतु, यशानं थोडक्यात हुलकावणी दिली. पुढे पुणे-मुंबईत जाऊन नोकरीचा विचार केला. वर्षभर नोकरीचा शोध घेतला परंतु पाहिजे तशी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे शेवटी थेट गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
दरम्यान, या अर्धा एकर मिरची शेतीतून खर्च वजा जाता सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत नफा अपेक्षित असल्याचे सीताराम सांगतात. तसेच उच्चशिक्षित तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय किंवा शेतीकडे वळावे. वडिलोपार्जित जमीन असेल तर आधुनिक शेती करून नोकरीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळवता येते, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे.










