16 व्या वर्षी डेब्यू, पहिलीच फिल्म ठरली ब्लॉकबस्टर; एका आजाराने उद्ध्वस्त केलं आयुष्य, आता कुठे आहे अभिनेत्री?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Guess Who: अवघ्या १६ व्या वर्षी गोविंदा आणि चंकी पांडे सारख्या सुपरस्टार्ससोबत सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि पहिल्याच चित्रपटातून रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.
९० च्या दशकातील ती चुलबुली मुलगी तुम्हाला आठवतेय का? जिने अवघ्या १६ व्या वर्षी गोविंदा आणि चंकी पांडे सारख्या सुपरस्टार्ससोबत सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि पहिल्याच चित्रपटातून रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. तिची जादू फक्त अभिनयापुरती मर्यादित नव्हती, तर आपल्या मखमली आवाजाने तिने 'पॉप म्युझिक'च्या दुनियेतही स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं होतं.
advertisement
advertisement
१९९३ मध्ये आलेल्या 'आंखें' या सुपरहिट चित्रपटातून रागेश्वरीने पदार्पण केलं. त्यानंतर 'मैं खिलाडी तू अनाडी' मध्ये अक्षय कुमार आणि सैफ अली खानसोबत तिची जोडी जमली. ती केवळ अभिनेत्री नव्हती, तर एमटीव्हीची (MTV) सर्वात लोकप्रिय व्हीजे (VJ) होती. 'दुनिया' आणि 'प्यार का राग' सारखी तिची अल्बम्स तुफान हिट झाली.
advertisement
पण साल २००० मध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. आपल्या वडिलांसोबत एक म्युझिक अल्बम लाँच केल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात रागेश्वरीला मलेरिया झाला. पण हा साधा मलेरिया नव्हता, तर त्यातून तिला 'बेल्स पाल्सी' नावाच्या गंभीर आजाराने घेरलं. या आजारामुळे तिच्या चेहऱ्याच्या अर्ध्या भागाला पॅरालिसिस झाला. तिचं बोलणं बंद झालं, चेहऱ्याचे स्नायू निकामी झाले आणि झगमगत्या ग्लॅमरच्या जगातून तिला बाहेर पडावं लागलं.
advertisement
advertisement
advertisement
२०१२ मध्ये ती लंडनला शिफ्ट झाली, जिथे तिची भेट मानवाधिकार वकील सुधांशु स्वरूप यांच्याशी झाली. वयाच्या ३९ व्या वर्षी रागेश्वरीने आणि ४१ व्या वर्षी सुधांशु यांनी २०१४ मध्ये लग्न केलं. त्यांच्या प्रेमाची गोष्ट आजही अनोखी आहे; ते आजही एकमेकांना सोशल मीडियावर शुभेच्छा देण्याऐवजी हाताने लिहिलेली पत्रं देतात.
advertisement
आज रागेश्वरी लूंबा ही एक यशस्वी अभिनेत्री नाही, तर जगप्रसिद्ध माइंडफुलनेस आणि मॅनिफेस्टेशन कोच म्हणून ओळखली जाते. ती 'पेंग्विन इंडिया'ची लेखिका आहे आणि जगभरातील लोकांना मानसिक शांतता आणि यशाचा मंत्र देते. तिला आता १० वर्षांची एक मुलगी आहे. ग्लॅमरच्या झगमगाटापासून दूर राहून रागेश्वरी आज हजारो लोकांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत आहे.








