प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने अचानक घेतला निरोप; शेवटचा एपिसोड न दाखवताच बंद
- Published by:Priya Lad
Last Updated:
Zee Marathi Paaru Serial : झी मराठीवर बऱ्याच नवीन मालिका आल्या आहेत. तरी काही जुन्या मालिका ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत, लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यापैकीच एका मालिकेने अचानक निरोप घेतला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
टीआरपी नसल्याने किंवा आर्थिक नुकसान झाल्याने मालिका गुंडाळली जाणे, हे आजवर अनेकदा झालं आहे. 'शुभ श्रावणी' सुरू झाल्यापासून 'पारू' रात्री 11 वाजताच्या स्लॉटला ऑन एअर केली जात होती. पण रात्री उशिराच्या स्लॉटलासुद्धा या मालिकेला चांगला टीआरपी मिळत होता. त्यामुळे पारू मालिका का संपली याबद्दल सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
advertisement
यामागे टीआरपीची गणितं नसून कलाकार आणि तंत्रज्ञांचं मानधन थकबाकी हे कारण असल्याचा अंदाज बांधला जातो आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून कलाकार आणि तंत्रज्ञांना मानधन मिळालं नव्हतं. याबाबत निर्मात्यांनी कोणतेही ठोस पाऊल उचललं नाही. त्यामुळे मालिकेचा गाशा गुंडाळण्याची वेळ आल्याचं सांगण्यात येतं.
advertisement
दरम्यान मालिकेचा शेवटचा एपिसोड नाही, शेवटच्या दिवशी कलाकारांनी केलेल्या कोणत्याही सेलिब्रेशनचे फोटो किंवा व्हिडीओ देखील समोर आलेले नाहीत. असं पहिल्यांदाचा झालं असावं. याबाबत मराठी सीरिअल्स ऑफिशिअल या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार या मालिकेचा लवकरच निरोपाचा शेवटचा आठवडा प्रसारित केला जाईल आणि याची वेळ लवकरच कळवली जाईल, असं म्हटलं आहे.
advertisement







