5 वर्ष गुपचूप प्रेम, ऑनस्क्रिन बहिणीलाच पटवलं; थाटात केलं लग्न, हा अभिनेता कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मनोरंजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यानं त्याच्या ऑनस्क्रिन बहिणीशी लग्न केलं. दोघांचा 30 हून अधिक वर्षांचा सुखाचा संसार सुरू आहे.
advertisement
advertisement
advertisement
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात जयराम चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असताना पार्वती आधीच एक आघाडीची अभिनेत्री होती. त्यावेळी पार्वती एक सुपरस्टार होती. जयराम आणि पार्वती पहिल्यांदा 1988 मध्ये "अबरन" चित्रपटात एकत्र दिसले. हा जयरामचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात पार्वती आणि जयराम यांनी भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती.
advertisement
त्याच वर्षी "विटनेस" हा सिनेमा आला होता. ज्यात पार्वती जयरामची मैत्रीण होती. यानंतर जयराम पहिल्याच नजरेत पार्वतीच्या प्रेमात पडला. पार्वती तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती तर जयराम एक नवोदित अभिनेता होता. जयरामची विनोदबुद्धी आणि मिमिक्री पार्वतीला खूप आवडली. "विटनेस" सिनेमाच्या सेटवर जयरामने पार्वतीला त्याच्या प्रेमाची कबुली दिली. पार्वतीने त्याला होकार दिला.
advertisement
जयराम आणि पार्वती यांनी त्यांच्या नात्याची माहिती कोणाला सांगितली नाही. जवळपास 5 वर्ष ते गुपचूप प्रेम करत होते. सेटवर दोघेही प्रोफेशनल वागायचे. या काळात दोघांनी जवळपास 12 सिनेमांमध्ये एकत्र काम केले. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत होती. तर दुसरीकडे ऑफस्क्रिन त्यांचं प्रेमही वाढत होतं.
advertisement
पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर पार्वती आणि जयराम यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्याला सुरुवातीला त्यांच्या कुटुंबियांकडून विरोध झाला. 7 सप्टेंबर 1992 रोजी त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झालं. मल्याळम चित्रपटसृष्टीत मोहनलाल आणि मामूटी प्रमाणे, जयराम कुटुंबातील प्रेक्षकांमध्ये एक प्रिय अभिनेता बनला. दुसरीकडे पार्वतीने तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सिनेसृष्टीला रामराम केला.
advertisement






