'साऊथ सिनेमे का चालतात?' मराठी चित्रपटांच्या मुद्द्यावर वर्षा उसगांवकर कडाडल्या, मुंबईकरांना दाखवला आरसा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Varsha Usgaonkar: मराठी चित्रपटसृष्टीची 'वंडर गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी पुन्हा एकदा आपल्या रोखठोक विधानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
advertisement
advertisement
मात्र, ही प्रगती होत असतानाच त्यांनी एक महत्त्वाची खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "सर्वात आधी आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असायला हवा. दाक्षिणात्य चित्रपट एवढे का चालतात? कारण तिथले लोक ते चित्रपट चालवतात. त्यांना त्यांच्या भाषेचं आणि संस्कृतीचं प्रचंड प्रेम आहे. तेच प्रेम आपण आपल्या मराठी भाषेवर दाखवलं पाहिजे."
advertisement
मराठी भाषेच्या जोपासनेवर बोलताना त्यांनी मुंबईतील तरुणाईला आरसा दाखवला. त्या म्हणाल्या, "मुंबईच्या मुलांची मराठी भाषा आज कुठे आहे? त्यांना खरोखर मराठी अवगत आहे का, हे बघण्याची वेळ आली आहे. प्रत्येक राज्याने आपली मातृभाषा जोपासली पाहिजे आणि मुंबईसारख्या शहरात राहूनही जर मराठी बोलताना आपण कचरत असू, तर तो चिंतेचा विषय आहे."
advertisement
advertisement









