सुरुवातीलाच ओळखले नाहीत तर मृत्यू अटळ! डॉक्टरही म्हणतात - वेळ निघून जाईल; तुमचं शरीर देतंय मोठा इशारा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते. 'द लॅन्सेट'च्या अहवालानुसार, २०५० पर्यंत कॅन्सरचा धोका वाढेल. ICMR च्या सर्वेक्षणानुसार, पाचपैकी तीन रुग्णांचा मृत्यू होतो.
advertisement
advertisement
कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकार शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर हल्ला करतो. प्रत्येक कॅन्सरची लक्षणेही वेगवेगळी असतात. आजकाल तरुण पिढीही या भयानक आजाराला बळी पडत आहे. 'द लॅन्सेट'च्या माहितीनुसार, कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या सर्वेक्षणानुसार, कॅन्सरग्रस्त पाचपैकी तीन रुग्णांचा मृत्यू होतो.
advertisement
'द लॅन्सेट'च्या अहवालानुसार, २०५० पर्यंत कॅन्सरचा धोका धोकादायक पातळी ओलांडेल. सध्या ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषतः स्तन कॅन्सर, लिम्फोमा आणि कोलन (आतड्याचा) कॅन्सरमध्ये वाढ दिसून येत आहे. यासोबतच, टेस्टिक्युलर (वृषण), किडनी आणि स्वादुपिंडाच्या (Pancreas) कॅन्सरच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.
advertisement
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनातून असं समोर आलं आहे की, कॅन्सर जेव्हा शरीरात घर करतो, तेव्हा सुरुवातीला काही लक्षणं दिसतात. या लक्षणांकडे लक्ष दिल्यास कॅन्सर पहिल्या स्टेजमध्येच ओळखता येऊ शकतो. संशोधनानुसार, कॅन्सर अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आढळल्यास उपचार अधिक प्रभावी होण्याची शक्यता खूप जास्त असते. तर मग, कॅन्सरला हरवण्यासाठी शरीरात कोणती लक्षणे दिसल्यास सावध व्हावे?
advertisement
रात्री जास्त घाम येणे, ताप, थंडी वाजणे किंवा अशक्तपणा: जर रात्री खूप घाम येत असेल, ताप येत असेल, थंडी वाजत असेल किंवा खूप अशक्त वाटत असेल, तर हे चिंतेचे कारण आहे. ही लक्षणे लिम्फोमा कॅन्सरची असू शकतात, जो रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतो. शरीरात कुठेही गाठ किंवा सूज दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement