नव्या वर्षाच्या स्वागताला बाहेर पडताय? जालन्यातील या 5 ठिकाणांना द्या भेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Jalna Tourism: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण घराबाहेर पडतात. जांबूवंत मंदिर आणि राजूर गणपतीसह जालन्यातील या 5 ठिकाणांना भेट देऊ शकता.
advertisement
राजूर गणपती: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये राजूर गणपती संस्थान आहे. जालना शहरापासून अवघे 25 किमी अंतरावर असलेली राजूर येथील गणपती मंदिर मराठवाड्याबरोबरच संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. चतुर्थीला इथे गणेश भक्तांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये राजूर गणपती संस्थानाला तुम्ही आवश्यक भेट देऊ शकता व नवीन वर्षाची प्रसन्न सुरुवात करू शकता.
advertisement
श्रीक्षेत्र जांब: समर्थ संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव म्हणजेच जांब समर्थ हे गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये आहे. रामदास स्वामींच्या या गावाला तुम्ही नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नाताळच्या सुट्ट्यांमध्ये आवश्यक भेट देऊ शकता. या ठिकाणी असलेले श्री राम मंदिर अतिशय पुरातन व प्राचीन असल्याचे सांगितलं जातं.
advertisement
जांबुवंत गड: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील जामखेड या गावात श्रीक्षेत्र जांबुवंतगड आहे. संपूर्ण देशामध्ये जांबुवंताचे एकमेव मंदिर जालना जिल्ह्यात या ठिकाणी आहे. तसेच जामखेड आणि आसपासच्या तब्बल 13 खेडेगावांमध्ये मारुतीच्या मंदिरा ऐवजी जांबुवंताचे मंदिर आहे. तसेच या 13 गावांमध्ये हनुमाना ऐवजी जांबुवंताची पूजा व आराधना केली जाते. नयन रम्य निसर्ग सौंदर्याने नटलेला हा गड तुम्ही सुट्ट्यांमध्ये पाहू शकता.
advertisement
advertisement
मोतीबाग चौपाटी: जालना शहरातील मोतीबाग चौपाटीला तुम्ही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करू शकता. मोती बागेमध्ये लहान मुलांसाठी टॉय ट्रेन, रंगीत कारंजे, विविध प्रकारच्या खेळण्या आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बाजूलाच असलेल्या मोती तलाव चौपाटीवर खवय्यांसाठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर असतात. ज्या ठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची चव तुम्ही घेऊ शकता.
advertisement