Kitchen Tips : फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ काळं का पडतं? यामागचं खरं कारण काय? प्रत्येक गृहिणीला हे माहित असायलाच पाहिजे
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पण, पीठ काळं पडण्यामागे कोणतंही 'गूढ' नाही, तर यामागे एक शुद्ध वैज्ञानिक प्रक्रिया (Scientific Process) आहे. नक्की असं का होतं? जाणून घेऊया यामागचं खरं कारण.
advertisement
advertisement
advertisement
1. ऑक्सिडेशनची प्रक्रिया (Oxidation Process)पिठात नैसर्गिकरित्या काही एन्झाइम्स (Enzymes) असतात. जेव्हा मळलेलं पीठ हवेच्या संपर्कात येतं, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आणि पिठातील एन्झाइम्स यांच्यात रासायनिक प्रक्रिया होते. यालाच 'ऑक्सिडेशन' म्हणतात. सफरचंद कापून ठेवल्यावर जसं थोड्या वेळाने काळं पडतं, अगदी तसंच मळलेलं पीठही हवेतील ऑक्सिजनमुळे काळपट पडू लागतं.
advertisement
2. टायरोसिनेज एन्झाइम (Tyrosinase Enzyme)गव्हाच्या पिठात 'टायरोसिनेज' नावाचे एक एन्झाइम असते. जेव्हा पीठ मळून ओलं केलं जातं, तेव्हा हे एन्झाइम सक्रिय होतं. फ्रिजमध्ये जरी तापमान कमी असलं, तरी फ्रिजमधील कोरड्या हवेमुळे आणि ऑक्सिजनमुळे पिठाच्या वरच्या थरावर 'मेलॅनिन' (Melanin) तयार होतं, ज्यामुळे पिठाचा रंग बदलतो.
advertisement
advertisement
advertisement
पीठ कधीही उघड्या भांड्यात किंवा फक्त ताटाने झाकून ठेवू नका. ते नेहमी हवाबंद डब्यात (Air-tight Container) ठेवा.डब्यात ठेवण्यापूर्वी पिठाला क्लिंग फिल्मने घट्ट गुंडाळून ठेवल्यास ऑक्सिडेशनची प्रक्रिया पूर्णपणे थांबवता येते.पीठ मळताना त्यात दोन-तीन थेंब लिंबाचा रस टाकल्यास 'अँटी-ऑक्सिडंट' म्हणून काम करतो आणि पीठ दीर्घकाळ पांढरं राहतं.
advertisement
काळं पडलेलं पीठ खाणं सुरक्षित आहे का?तज्ज्ञांच्या मते, जर पिठाचा फक्त वरचा थर काळपट झाला असेल आणि त्याला कोणताही दुर्गंधी येत नसेल, तर ते पीठ खराब झालेलं नसतं. तुम्ही तो वरचा पातळ थर काढून टाकून आतील पिठाच्या चपात्या बनवू शकता. मात्र, जर पिठाला आंबट वास येत असेल किंवा त्यावर बुरशी दिसत असेल, तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.






