महाराष्ट्रातलं असं हे शुद्ध शाकाहारी गाव; चिकन-मटणाचं एकही नाही दुकान! PHOTOS

Last Updated:
निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या ज्योतिबाच्या वाडी गावाला एक वेगळाच इतिहास आहे. या गावात मांसाहार केला जात नाही.
1/5
महाराष्ट्रात अनेकजण शुद्ध शाकाहारी असल्याचं आपल्याला माहितीच असेल. पण एखादं आख्खं गावच शुद्ध शाकाहारी आहे, असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. पण महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात असं एक गाव आहे. जिथल्या चुलींवर कधीच मटण शिजलं नाही. तसेच गावातील कुणीही मांसाहार करत नाही. याच भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी या गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रात अनेकजण शुद्ध शाकाहारी असल्याचं आपल्याला माहितीच असेल. पण एखादं आख्खं गावच शुद्ध शाकाहारी आहे, असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. पण महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात असं एक गाव आहे. जिथल्या चुलींवर कधीच मटण शिजलं नाही. तसेच गावातील कुणीही मांसाहार करत नाही. याच भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी या गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
2/5
ज्योतिबाची वाडी हे बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं खेडेगाव आहे. दोन ते अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात डोंगर पायथ्याच्या कुशीत श्री ज्योतिबाचं देवस्थान आहे.
ज्योतिबाची वाडी हे बालाघाट डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं खेडेगाव आहे. दोन ते अडीच हजार लोकसंख्येच्या या गावात डोंगर पायथ्याच्या कुशीत श्री ज्योतिबाचं देवस्थान आहे.
advertisement
3/5
 निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या ज्योतिबाच्या वाडी गावाला एक वेगळाच इतिहास आहे. या गावात मांसाहार केला जात नाही. शेकडो वर्षांपासून हे गाव शुद्ध शाकाहारी असून गावात कोणत्याही प्राण्याची मांसाहारासाठी हत्या होत नाही, असे गावकरी सांगतात.
निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या या ज्योतिबाच्या वाडी गावाला एक वेगळाच इतिहास आहे. या गावात मांसाहार केला जात नाही. शेकडो वर्षांपासून हे गाव शुद्ध शाकाहारी असून गावात कोणत्याही प्राण्याची मांसाहारासाठी हत्या होत नाही, असे गावकरी सांगतात.
advertisement
4/5
ज्योतिबाची वाडी येथील महिलांना मांसाहारी जेवणाची रेसिपीच माहिती नाही. कारण गावात कधीच मांसाहारी जेवण बनवले जात नाही. किंबहुना बाहेर गावच्या मुली लग्न होऊन गावात आल्यास त्याही गावाची परंपरा पाळतात, असंही गावकरी सांगतात.
ज्योतिबाची वाडी येथील महिलांना मांसाहारी जेवणाची रेसिपीच माहिती नाही. कारण गावात कधीच मांसाहारी जेवण बनवले जात नाही. किंबहुना बाहेर गावच्या मुली लग्न होऊन गावात आल्यास त्याही गावाची परंपरा पाळतात, असंही गावकरी सांगतात.
advertisement
5/5
श्री ज्योतिबाचं देवस्थान असलेल्या या गावात दरवर्षी ज्योतिबाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रा उत्सवाला धाराशिवसह लातूर, बीड, सोलापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून मोठी गर्दी होत असते. मात्र, हे गाव अद्यापही विकासापासून वंचित आहे. गावात पुरेशा सोयीसुविधांचा अभाव असल्याची तक्रारही गावकरी करतात.
श्री ज्योतिबाचं देवस्थान असलेल्या या गावात दरवर्षी ज्योतिबाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रा उत्सवाला धाराशिवसह लातूर, बीड, सोलापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यांतून मोठी गर्दी होत असते. मात्र, हे गाव अद्यापही विकासापासून वंचित आहे. गावात पुरेशा सोयीसुविधांचा अभाव असल्याची तक्रारही गावकरी करतात.
advertisement
BMC Election : ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थेट पत्र
‘BMC ELECTION IS NOT…’ वरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे
  • ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे

  • ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे

  • ‘BMC ELECTION IS NOT…’ पोस्टवरून भाजपातच कलह? पदाधिकाऱ्याचं मुंबई अध्यक्षांना थे

View All
advertisement