advertisement

Mumbai Amravati Express Accident : जळगावात मुंबई-अमरावती एक्सप्रेसचा अपघात, पहाटे 4 वाजता नेमकं काय घडलं?

Last Updated:
Mumbai Amravati Express Accident : गेल्या काही दिवसात रेल्वे अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता जळगावजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
1/7
गेल्या पाच वर्षांत, 200 रेल्वे अपघातांमध्ये 351 जणांचा मृत्यू झाला आणि 970 जण जखमी झाले, असं भारतीय रेल्वेने 17 रेल्वे झोनमधून शेअर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येतंय.
गेल्या पाच वर्षांत, 200 रेल्वे अपघातांमध्ये 351 जणांचा मृत्यू झाला आणि 970 जण जखमी झाले, असं भारतीय रेल्वेने 17 रेल्वे झोनमधून शेअर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येतंय.
advertisement
2/7
अशातच आता जळगावातून मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे चार वाजता हा अपघात घडला आहे.
अशातच आता जळगावातून मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे चार वाजता हा अपघात घडला आहे.
advertisement
3/7
बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ट्रॅकवर आल्याने मुंबई अमरावती एक्सप्रेस ट्रकला धडकल्याची घटना घडली आहे.
बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ट्रॅकवर आल्याने मुंबई अमरावती एक्सप्रेस ट्रकला धडकल्याची घटना घडली आहे.
advertisement
4/7
बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजता ही घटना घडली. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजता ही घटना घडली. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
5/7
पहाटे 4 वाजल्यापासून मुंबई हावडा मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना संकटाचा सामना करावा लागतोय.
पहाटे 4 वाजल्यापासून मुंबई हावडा मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना संकटाचा सामना करावा लागतोय.
advertisement
6/7
अमरावती एक्सप्रेसच्या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार आहे. तसेच जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतीये.
अमरावती एक्सप्रेसच्या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार आहे. तसेच जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतीये.
advertisement
7/7
दरम्यान, गेल्या तीन तासांपासून प्रवासी अडकले आहेत. रेल्वे प्रवाशांना माहिती देत ​​नाही, अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, गेल्या तीन तासांपासून प्रवासी अडकले आहेत. रेल्वे प्रवाशांना माहिती देत ​​नाही, अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे.
advertisement
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement