अतिवृष्टी होणाऱ्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई, जलसंधारणासाठी सरसावले जावळीकर, PHOTOS
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात अतिवृष्टी होत असली तरी उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं. हीच बाब लक्षात घेऊन पाणी चळवळीला गती मिळत आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका निसर्ग संपन्न मानला जातो. डोंगरदऱ्यात वसलेल्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जनवृष्टी होत असते. अतिवृष्टीचा तालुका म्हणून जावळीची ओळख असली तरी उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं. हीच बाब लक्षात घेऊन तालुक्यात पाणी चळवळीला गती मिळत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बामणोली तर्फ कुडाळ येथील ग्रामस्थांनी गावालगत्या टेकडीवर 2100 देशी वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, चिंच अशा प्रकारची झाडे आहेत. या वृक्षारोपणाला दोन वर्षे झाली असून यातील 2 हजार झाडे जगवली आहेत. यासाठी त्यांनी या टेकडीवर विहीर काढली आहे, तसेच सीसीटी बंधारे पण घेतले आहेत.
advertisement
advertisement
मित्रमेळा सामाजिक संस्था सुद्धा पर्यावरण व वृक्ष संगोपन चळवळीसाठी कार्यरत आहे. गेले 3-4 वर्षे सातत्याने वेण्णा नदी स्वच्छता मोहीम, वणवा प्रतिबंधक मोहीम राबवत आहेत. अशा प्रयत्नांतून नैसर्गिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या जावळी तालुका निश्चित पर्यावरण व जलसंधारणामध्ये राज्य पातळीवर नावारूपाला येईल असे चित्र दिसत आहे. (शुभम बोडके, प्रतिनिधी)