आजचं हवामान: मे महिन्यापासून कोसळणाऱ्या पावसाला ब्रेक, कोकणात हवापालट, मुंबई-ठाण्याचं अपडेट काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात बदल जाणवत असून नोव्हेंबरमध्ये हवापालट झाल्याचे चित्र आहे. मे महिन्यापसून कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती गेतली आहे.
महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 9 नोव्हेंबर रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, कोकण किनारपट्टीवर आता थंडीची चाहूल लागली असून, दिवसाचं ऊन आणि सकाळ-संध्याकाळी हलका गारवा जाणवणार आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाला अखेर विश्रांती मिळाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये आकाश स्वच्छ ते थोडे ढगाळ राहील. तापमान सुमारे 27 ते 30 अंश सेल्सियस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळ-संध्याकाळ समुद्रकिनाऱ्याजवळ गार वारे वाहतील आणि हलका थंडीचा स्पर्श जाणवेल. पावसाने विश्रांती घेतल्याने आर्द्रता कमी झाली आहे, त्यामुळे हवामान तुलनेने सुखद राहील.


