Weather Alert : ताशी 60 किमी वेगाने वारे वाहणार, महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, 30 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
राज्यातील 18 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट तर 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 24 तास धोक्याचे असणार आहेत. विभागानुसार सविस्तर हवामान अपडेट जाणून घेऊ.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मार्च महिन्याचा शेवटचा दिवस अवकाळी पावसाचा राहणार आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट तर 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 24 तास धोक्याचे असणार आहेत. विभागानुसार सविस्तर हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांना अवकाळी तडाखा बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नांदेड, लातूर आणि धाराशिवला यलो अलर्ट असेल. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती पिकांना धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
advertisement









