Weather Alert: राज्यात शनिवार तुफान पावसाचा! हवामान विभागाकडून 30 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
16 ऑगस्ट रोजीही राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना विविध अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. 15 ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागांत चांगला पाऊस झालाय. 16 ऑगस्ट रोजीही राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना विविध अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. पुढील 24 तासांत राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. पाहुयात, 16 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या तिन्ही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूर, यवतमाळ या दोन जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या 8 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम या तीन जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली नाही. याठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे.
advertisement
16 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाचा जोर वाढल्याने हवामान विभागाच्या अंदाजावरून लक्षात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतीची कामे करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.