पुणे आता पहिल्यासारखं राहिलं नाही! ‘या’ भागात धोका वाढला, आकडेवारीनं वाढवलं टेन्शन!
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: पुणेकरांना घराबाहेर पडताना जरा विचार करूनच बाहेर पडावं लागणार आहे. शहरात धोका वाढला असून हवा अतिखराब पातळीवर गेलीये.
गेल्या काही महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हवामानात प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता अनेक ठिकाणी अतिखराब पातळीवर नोंदवली जात आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकड आणि हिंजवडी परिसरातील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांत गंभीर स्तरावर पोहोचली आहे. या भागात कार्यरत असलेल्या आरएमसी प्रकल्पांमुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढत असून प्रदूषणात भर पडत आहे.
advertisement
याशिवाय सलग सुट्टीमुळे बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या वाहनांची संख्या वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. परिणामी, या परिसरातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) धोकादायक 300 च्या पुढे गेला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच पंधरवड्यात शहराच्या एक्यूआयने 14 दिवसांपैकी सात दिवस 200 अंकांची मर्यादा ओलांडली होती. यामुळे डिसेंबर महिना सुरू झाल्यापासूनच हवेची पातळी खालावत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वाकड आणि हिंजवडी भागात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील बांधकाम कामांमुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाय पुरेशा प्रमाणात राबवले जात नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय परिसरात कार्यरत असलेल्या अनेक आरएमसी प्रकल्पांमधून उडणारी सिमेंटची धूळ आणि या प्रकल्पांशी संबंधित जड वाहनांची वर्दळ यामुळेही हवेची गुणवत्ता घसरत आहे. परिणामी, या भागातील प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र होत चालली आहे.










