Akshaya Tritiya 2025 : तब्बल 84 वर्षांना जुळून आलाय योग! 'या' दिवशी खरेदी करा सोनं आणि मुहूर्त न पाहता करा शुभ काम!

Last Updated:
30 एप्रिल 2025 रोजी येणारी अक्षय्य तृतीया अत्यंत विशेष मानली जात आहे. 84 वर्षांनंतर सूर्य आणि चंद्र उच्च राशीत असून, सर्वार्थ सिद्धी योग देखील आहे. यामुळे या वर्षीचा दिवस अतीशय शुभ आहे. या दिवशी
1/8
 हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेच्या सणाला विशेष महत्त्व आहे, जो यावर्षी 30 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. या सणाचं आणि तिथीचं महत्त्व असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या दिवशी हिंदू धर्मातील कोणतंही शुभ कार्य मुहूर्त न पाहता करता येतं.
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेच्या सणाला विशेष महत्त्व आहे, जो यावर्षी 30 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. या सणाचं आणि तिथीचं महत्त्व असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या दिवशी हिंदू धर्मातील कोणतंही शुभ कार्य मुहूर्त न पाहता करता येतं.
advertisement
2/8
 धार्मिक मान्यता आहे की, या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य भविष्यात शुभ फळ देणारे ठरते. पण विशेष गोष्ट ही आहे की, यंदाची अक्षय्य तृतीया ही काही साधी अक्षय्य तृतीया नाही. यावर्षी जवळपास 84 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला एक मोठा योगायोग जुळून येत आहे.
धार्मिक मान्यता आहे की, या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य भविष्यात शुभ फळ देणारे ठरते. पण विशेष गोष्ट ही आहे की, यंदाची अक्षय्य तृतीया ही काही साधी अक्षय्य तृतीया नाही. यावर्षी जवळपास 84 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला एक मोठा योगायोग जुळून येत आहे.
advertisement
3/8
 हिंडौनचे प्रसिद्ध ज्योतिषी पं. धीरज शर्मा सांगतात की, यावर्षी अक्षय्य तृतीयेला 84 वर्षांनंतर एक खूप मोठा योगायोग दिसत आहे, ज्यामध्ये यावेळी सूर्य आणि चंद्र या तिथीला उच्च स्थितीत असतील. शनि, शुक्र, राहू हे इतर ग्रह या तिथीला मीन राशीत असतील.
हिंडौनचे प्रसिद्ध ज्योतिषी पं. धीरज शर्मा सांगतात की, यावर्षी अक्षय्य तृतीयेला 84 वर्षांनंतर एक खूप मोठा योगायोग दिसत आहे, ज्यामध्ये यावेळी सूर्य आणि चंद्र या तिथीला उच्च स्थितीत असतील. शनि, शुक्र, राहू हे इतर ग्रह या तिथीला मीन राशीत असतील.
advertisement
4/8
 ज्योतिषी म्हणतात की, या विशेष योगायोगामुळे अक्षय्य तृतीयेचं महत्त्व अनेक पटीने वाढतं. याशिवाय, यावर्षीच्या अक्षय्य तृतीयेला दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग देखील राहणार आहे.
ज्योतिषी म्हणतात की, या विशेष योगायोगामुळे अक्षय्य तृतीयेचं महत्त्व अनेक पटीने वाढतं. याशिवाय, यावर्षीच्या अक्षय्य तृतीयेला दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग देखील राहणार आहे.
advertisement
5/8
 अक्षय्य तृतीया ही हिंदू धर्मातील सर्वात खास तिथींपैकी एक आहे. पंडित धीरज शर्मा लोकल 18 ला सांगतात की, या तिथीचं महत्त्व हिंदू धर्मात यामुळे वाढतं कारण या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी पंडित किंवा पंचांग पाहण्याची गरज नसते. असं म्हणतात की, या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ कधीही संपत नाही (अक्षय राहते).
अक्षय्य तृतीया ही हिंदू धर्मातील सर्वात खास तिथींपैकी एक आहे. पंडित धीरज शर्मा लोकल 18 ला सांगतात की, या तिथीचं महत्त्व हिंदू धर्मात यामुळे वाढतं कारण या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी पंडित किंवा पंचांग पाहण्याची गरज नसते. असं म्हणतात की, या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ कधीही संपत नाही (अक्षय राहते).
advertisement
6/8
 अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे शक्य असल्यास या दिवशी सोनं नक्की खरेदी करा. ज्योतिषी म्हणतात की, या दिवशी सोनं खरेदी केल्याने तुमच्या धनात वाढ होते. तुमचा खजिना कधीही रिकामा होत नाही. याशिवाय, या तिथीला सोनं खरेदी केल्याने कुटुंबात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे शक्य असल्यास या दिवशी सोनं नक्की खरेदी करा. ज्योतिषी म्हणतात की, या दिवशी सोनं खरेदी केल्याने तुमच्या धनात वाढ होते. तुमचा खजिना कधीही रिकामा होत नाही. याशिवाय, या तिथीला सोनं खरेदी केल्याने कुटुंबात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
advertisement
7/8
 ज्योतिषी पंडित धीरज शर्मा यांच्या मते, या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सकाळी लवकर उठून दोघांची पूजा करावी. पूजेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना या दिवशी स्नान घालावं. त्यानंतर त्यांना फळं आणि मिठाई अर्पण करून दोघांची आरती करावी.
ज्योतिषी पंडित धीरज शर्मा यांच्या मते, या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सकाळी लवकर उठून दोघांची पूजा करावी. पूजेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना या दिवशी स्नान घालावं. त्यानंतर त्यांना फळं आणि मिठाई अर्पण करून दोघांची आरती करावी.
advertisement
8/8
 ज्योतिषी सांगतात की, या दिवशी दान, स्नान, हवन-यज्ञ यांचं विशेष महत्त्व आहे. खासकरून या दिवशी दान केल्याने अक्षय्य पुण्य मिळतं. दरवर्षी हा सण उन्हाळ्यात येतो. त्यामुळे या दिवशी पाणी, सरबत आणि थंडाईचं दान प्रत्येकाने नक्की करावं.
ज्योतिषी सांगतात की, या दिवशी दान, स्नान, हवन-यज्ञ यांचं विशेष महत्त्व आहे. खासकरून या दिवशी दान केल्याने अक्षय्य पुण्य मिळतं. दरवर्षी हा सण उन्हाळ्यात येतो. त्यामुळे या दिवशी पाणी, सरबत आणि थंडाईचं दान प्रत्येकाने नक्की करावं.
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement