नवरात्रीच्या नऊ दिवसांत 'ही' 6 काम करणं बॅन, देवी लक्ष्मी होईल नाराज; होईल मोठं आर्थिक नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
यंदा 19 मार्च ते 27 मार्च 2026 या कालावधीत चैत्र नवरात्र साजरी होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस हे आदिशक्तीच्या उपासनेचे आणि आत्मशुद्धीचे मानले जातात. शास्त्रांनुसार, या काळात भक्तांनी केवळ पूजेवरच लक्ष केंद्रित करू नये, तर आपल्या आचरणातही शिस्त पाळणे आवश्यक आहे.
यंदा 19 मार्च ते 27 मार्च 2026 या कालावधीत चैत्र नवरात्र साजरी होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस हे आदिशक्तीच्या उपासनेचे आणि आत्मशुद्धीचे मानले जातात. शास्त्रांनुसार, या काळात भक्तांनी केवळ पूजेवरच लक्ष केंद्रित करू नये, तर आपल्या आचरणातही शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्याने नवरात्रीच्या उपवासाचे फळ मिळत नाही आणि घरातून लक्ष्मी निघून जाते, असे मानले जाते.
advertisement
तामसिक अन्नाचे सेवन: नवरात्रीच्या नऊ दिवसांत घरात पूर्णपणे सात्त्विक वातावरण असणे गरजेचे आहे. या काळात कांदा, लसूण, मांस आणि मद्यपान यांपासून दूर राहावे. "जसे अन्न, तसे मन" या उक्तीनुसार, तामसिक पदार्थ खाल्ल्याने मनात नकारात्मक विचार येतात आणि पूजेत अडथळे निर्माण होतात. यामुळे लक्ष्मी माता घराचा त्याग करते, अशी मान्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दिवसा झोपणे: उपवास करणाऱ्या व्यक्तीने नवरात्रीच्या नऊ दिवसांत दिवसा झोपणे टाळावे. शास्त्रांनुसार, उपवासात दिवसा झोपल्याने आळस वाढतो आणि साधनेमध्ये व्यत्यय येतो. हा काळ मंत्रजप, भजन आणि कीर्तनासाठी असतो, त्यामुळे स्वतःला उत्साही ठेवणे आवश्यक आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)










