आज त्रास होईल, होळीनंतर नशीब बदलेल! 4 राशींचा फायदाच फायदा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
31 मार्चला शुक्राचा मीनप्रवेश होईल. तिथं राहू आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे मीन राशीत होणाऱ्या या दोन ग्रहांच्या युतीचा 4 राशींच्या व्यक्तींना भरभरून फायदा मिळेल. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
होळीनंतर शुक्र ग्रहाचं राशीपरिवर्तन होणार आहे. जेव्हा शुक्र एखाद्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा परिणाम थेट सर्व राशींच्या सुखावर होतो. कारण शुक्राला सुख, संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक मानलं जातं. ज्या राशींना शुक्राचा आशीर्वाद मिळतो, त्यांच्यावर लक्ष्मी देवीचा कृपा सदैव राहते. मग त्यांची सर्व बिघडलेलं कामं सुरळीत होतात. आता त्याच्या आशीर्वादाने 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब अगदी उजळून निघणार आहे. याबाबत झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात की, तब्बल 25 वर्षांनी शुक्र आणि राहूची युती होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement