Team India : गंभीरचा 'खौफ'... हार्दिक-गिलनंतर तिसऱ्याचा 'बळी', वर्ल्ड कपमध्येच टीम इंडियात उलथापालथ!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा धक्का बसला आहे, पण सेमी फायनलची रेस सुरू असताना झालेला हा पराभव टीम इंडियाला जिव्हारी लागणारा आहे.
advertisement
advertisement
advertisement
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड झाली तेव्हा अक्षर पटेलला उपकर्णधार केलं गेलं, पण उपकर्णधारालाच टीममधून बाहेर ठेवण्याचा निर्णय टीम इंडियाने घेतला, जो शेवटी त्यांनाच महागात पडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टॉसवेळीही कर्णधार सूर्यकुमार यादवने अक्षर पटेलबद्दल कठोर निर्णय घ्यावा लागल्याचं मान्य केलं होतं.
advertisement
advertisement
2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाने 3 उपकर्णधार बदलले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा हार्दिक पांड्या उपकर्णधार होता. रोहितने निवृत्ती घेतल्यानंतर हार्दिक कॅप्टन्सीच्या रेसमध्ये होता, तसंच त्याला आयपीएलमध्येही कर्णधारपदाचा अनुभव होता, पण त्याच्याऐवजी सूर्याला कॅप्टन करण्यात आलं.
advertisement
advertisement







