T20 World Cup : भारतापेक्षा पाकिस्तानचं सेमी फायनलचं इक्वेशन सोपं, श्रीलंकेला किती रननी हरवावं लागणार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या रेसमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. सुपर-8 च्या ग्रुप 2 मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केल्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
न्यूझीलंडच्या नेट रनरेटला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानने पहिले बॅटिंग करून 160 रन केले तर त्यांना श्रीलंकेला 96 किंवा त्यापेक्षा कमी रनवर रोखावं लागणार आहे. पाकिस्तानने 180 रन केले तर श्रीलंकेला 116 रन तसंच 200 रन केले तर 135 रनवर थांबवावं लागेल. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हा सामना 64 ते 65 रनच्या फरकाने जिंकावा लागेल.
advertisement
या सामन्यात पाकिस्तानला आव्हानाचा पाठलाग करावा लागला तर त्यांना लवकर सामना संपवावा लागेल. श्रीलंकेने 140 रनचं आव्हान दिलं तर 13 ओव्हरमध्ये, 160 रनचं आव्हान 13.2 ओव्हरमध्ये पार करावं लागणार आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तानला 64 रननी विजय मिळवावा लागेल किंवा 13 ओव्हरमध्ये श्रीलंकेचं आव्हान पार करावं लागेल.
advertisement








