Yuvraj Singh : 'आम्ही त्या रात्री...' 2011च्या वर्ल्ड कपला 14 वर्ष पूर्ण, भावनिक पोस्ट शेअर करत युवीने सांगितला 'तो' क्षण

Last Updated:
Yuvraj Singh Social Media Post World Cup 2011 : 2 एप्रिल 2011 रोजी भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला. युवराज सिंगने बुधवारी सोशल मीडियावर या अविस्मरणीय क्षणाबद्दल पोस्ट केली.
1/7
भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनंतर 2 एप्रिल 2011 रोजी एकदिवसीय विश्वचषक जिंकला. आता या विजयाची आठवण करून देत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनंतर 2 एप्रिल 2011 रोजी एकदिवसीय विश्वचषक जिंकला. आता या विजयाची आठवण करून देत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
advertisement
2/7
युवराजने लिहिले, “2 एप्रिल 2011 – त्या रात्री आम्ही ते करोडो लोकांसाठी केले…आणि एका व्यक्तीसाठी ज्याने जवळपास दोन दशके भारतीय क्रिकेट आपल्या खांद्यावर घेतले.
युवराजने लिहिले, “2 एप्रिल 2011 – त्या रात्री आम्ही ते करोडो लोकांसाठी केले…आणि एका व्यक्तीसाठी ज्याने जवळपास दोन दशके भारतीय क्रिकेट आपल्या खांद्यावर घेतले.
advertisement
3/7
तो विश्वचषक केवळ एक विजय नव्हता तो एका लेजंडसाठी आमचे आभार होते. आम्ही सचिन तेंडुलकरला खेळताना बघत मोठे झालो.
तो विश्वचषक केवळ एक विजय नव्हता तो एका लेजंडसाठी आमचे आभार होते. आम्ही सचिन तेंडुलकरला खेळताना बघत मोठे झालो.
advertisement
4/7
त्या रात्री, आम्ही त्याला तो हक्काचा क्षण देण्यासाठी खेळलो. 14 वर्षांनंतरही भारताचा विजय मला अजूनही अंगावर काटा आणतो. ही रात्र आम्ही कधीही विसरणार नाही.
त्या रात्री, आम्ही त्याला तो हक्काचा क्षण देण्यासाठी खेळलो. 14 वर्षांनंतरही भारताचा विजय मला अजूनही अंगावर काटा आणतो. ही रात्र आम्ही कधीही विसरणार नाही.
advertisement
5/7
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. जिथे भारताने श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताकडून गंभीरने 97 धावा केल्या आणि एमएस धोनीने नाबाद 91 धावा केल्या.
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. जिथे भारताने श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताकडून गंभीरने 97 धावा केल्या आणि एमएस धोनीने नाबाद 91 धावा केल्या.
advertisement
6/7
युवराजने अंतिम सामन्यात 21 धावांची नाबाद खेळी केली. त्याने दोन महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या. संपूर्ण स्पर्धेत युवराजने चमकदार कामगिरी केली. त्याने चेंडू आणि बॅट दोन्हीने चमत्कार केले.
युवराजने अंतिम सामन्यात 21 धावांची नाबाद खेळी केली. त्याने दोन महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या. संपूर्ण स्पर्धेत युवराजने चमकदार कामगिरी केली. त्याने चेंडू आणि बॅट दोन्हीने चमत्कार केले.
advertisement
7/7
युवराजने स्पर्धेत एकूण 362 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्याने एकूण 15 विकेट्स घेतल्या. युवराजला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
युवराजने स्पर्धेत एकूण 362 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्याने एकूण 15 विकेट्स घेतल्या. युवराजला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement