मुंबईसह विदर्भातील तापमानात वाढ, अकोल्याला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि अकोला या जिल्ह्यांना 12 मार्चसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकणसह आता विदर्भातही उष्णतेचा येलो अलर्ट जारी केल्याने नागरिकांची चिंता वाढीस लागली आहे.
मुंबई : राज्यातील तापमानात वाढ होऊन मार्च महिन्यात 42 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याचे आपण बघितले. त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणी उष्णतेचा येलो अलर्ट सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. आताही तो काही जिल्ह्यांत कायम असलेला दिसून येत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि अकोला या जिल्ह्यांना 12 मार्चसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकणसह आता विदर्भातही उष्णतेचा येलो अलर्ट जारी केल्याने नागरिकांची चिंता वाढीस लागली आहे. पाहुयात 12 मार्चला राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
12 मार्चला राज्यात सर्वत्र मुख्यतः निरभ्र आकाश राहून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईत मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. त्याचबरोबर मुंबईत 12 मार्चसाठी उष्णतेचा येलो अलर्ट सुद्धा जारी केलाय. त्यामुळे उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसांत तापमानात घट होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून मिळाली आहे.
advertisement
पुण्यातील तापमानात 2 अंशांनी वाढ होऊन तेथील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 12 मार्चला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुण्यातील तापमान पुढील 3 दिवस स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यानंतर तेथील तापमानात घट बघायला मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी निरभ्र आकाश असू शकतं. पुढील काही दिवसांत तेथील तापमानात अंशतः घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
नाशिकमधील तापमानात वाढ होऊन तेथील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असू शकतं. 12 मार्चला नाशिकमधील तापमानात अंशतः वाढ बघायला मिळत आहे.
advertisement
नागपूरमधील तापमानात देखील वाढ होऊन तेथील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 12 मार्चला नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. नागपूरमधील तापमानात अंशतः वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. 12 मार्चसाठी सुद्धा काही शहरांना उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना आता उन्हाचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 11, 2025 9:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबईसह विदर्भातील तापमानात वाढ, अकोल्याला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

