सावधान! घरात चुकीच्या दिशेला लावलात 'ही' 3 झाडं, तर होईल मोठं नुकसान; योग्य दिशा बदलेल नशीब
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आजकाल प्रत्येकाला आपले राहते घर फक्त राहण्याची जागा न राहता, सकारात्मक ऊर्जेने भरलेली जागा असावी असे वाटते. वास्तूशास्त्रानुसार, आपल्या घरात असलेल्या वनस्पती केवळ सौंदर्यासाठी नसून त्या ऊर्जेचे स्रोत असतात.
Vastu Tips : आजकाल प्रत्येकाला आपले राहते घर फक्त राहण्याची जागा न राहता, सकारात्मक ऊर्जेने भरलेली जागा असावी असे वाटते. वास्तूशास्त्रानुसार, आपल्या घरात असलेल्या वनस्पती केवळ सौंदर्यासाठी नसून त्या ऊर्जेचे स्रोत असतात. विशेषतः घरात लावलेली झाडे, जी केवळ सजावटीसाठी नसतात, तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कामही करतात. बरेच लोक आपल्या घरात झाडे लावतात, परंतु योग्य दिशा आणि योग्य जागेकडे लक्ष देत नाहीत. यामुळे त्यांना अपेक्षित लाभ मिळत नाहीत. जर तुम्ही योग्य पद्धतीने झाडे लावली, तर ती केवळ घराचे सौंदर्यच वाढवत नाहीत, तर धन, शांती आणि समृद्धी देखील आणतात.
तुळस: आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक
हिंदू धर्मात तुळशीला 'लक्ष्मी'चे स्वरूप मानले जाते. तिची चुकीच्या दिशेला केलेली मांडणी घरातील शांतता भंग करू शकते. तुळशीसाठी उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. या दिशांना तुळस लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तुळस कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. दक्षिण ही यमराजाची दिशा मानली जाते, तिथे तुळस ठेवल्याने आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच, तुळशीजवळ चपला, कचरा किंवा काटेरी झाडे ठेवू नका.
advertisement
मनी प्लांट: संपत्ती आकर्षित करणारे रोप
नावाप्रमाणेच हे रोप आर्थिक प्रगतीसाठी लावले जाते. मात्र, याची वाढ आणि दिशा खूप महत्त्वाची असते. वास्तूशास्त्रानुसार, मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला लावावे. या दिशेचा स्वामी 'गणेश' आणि ग्रह 'शुक्र' आहे, जे संपत्तीचे कारक आहेत. मनी प्लांट चुकूनही ईशान्य दिशेला ठेवू नये. या दिशेला मनी प्लांट ठेवल्याने देवगुरु बृहस्पती आणि शुक्राच्या शत्रुत्वामुळे घरामध्ये भांडणे आणि पैशांचा अपव्यय होतो. तसेच, मनी प्लांटचे वेल कधीही जमिनीवर लोळू देऊ नका, ते नेहमी दोरीच्या सहाय्याने वरच्या दिशेला वाढवा.
advertisement
लकी बांबू: भाग्याची साथ देणारे रोप
फेंगशुई आणि वास्तूमध्ये बांबूच्या रोपाला भाग्योदयाचे प्रतीक मानले जाते. हे रोप घरामध्ये सकारात्मक ऊर्जेची गती वाढवते. बांबूचे रोप घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि मान-सन्मान वाढतो. जर तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल, तर ते आग्नेय दिशेला देखील ठेवू शकता. बांबूचे रोप कधीही अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा बाथरुमजवळ ठेवू नका. तसेच, यातील पाणी दर आठवड्याला बदलावे. जर बांबूचे एखादे स्टेम वाळले किंवा पिवळे पडले, तर ते त्वरित काढून टाकावे, अन्यथा ते घरातील प्रगती थांबवते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 6:27 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
सावधान! घरात चुकीच्या दिशेला लावलात 'ही' 3 झाडं, तर होईल मोठं नुकसान; योग्य दिशा बदलेल नशीब









