advertisement

Asia Cup विजयानंतर अभिषेक शर्माच्या घरात लगीनघाई, दोन दिवसांनी सनई चौघडा वाजणार

Last Updated:

टीम इंडियाचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा यांच्या घरात लगीनघाई सूरू आहे. दोनच दिवसात त्याच्या घरात बँन्डबाजा वाजणार आहे.त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे.

Abhishek sharma
Abhishek sharma
Abhishek Sharma News: आशिया कपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने 5 विकेट राखून पाकिस्तानचा पराभव करत कप जिंकला आहे. या विजयानंतर टीम इंडिया आता मायदेशी परतणार आहे. तर टीम इंडियाचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा यांच्या घरात लगीनघाई सूरू आहे. दोनच दिवसात त्याच्या घरात बँन्डबाजा वाजणार आहे.त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. त्यात आता अभिषेक शर्मा आशिया कप घेऊन भारतात येत असल्याने त्यांच्या घरात हा आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे. पण नेमकं लग्न कुणाचं आहे? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.त्यामुळे अभिषेकच्या घरात लग्न कुणाचं आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या घरी त्याची बहिण कोमलच्या लग्नाची तयारी सूरू आहे. त्याचं अख्खं कुटुंब या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.या दरम्यान भारताच्या विजयावर बोलताना अभिषेकची आई म्हणाली की, घर आधीच उत्सवांनी भरलेले होते,त्यात आता अभिषेक आणि भारतीय संघाने विजय मिळवून त्यांच्या आयुष्यात आणखी आनंद भरला असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान भारताच्या या विजयानंतर कोलम शर्मा हिने न्यूज 18 इंडियाशी बातचित केली आहे. यावेळी बोलताना कोमल म्हणाली की, अभिषेकने मला विचारले की मला लग्नाची कोणती भेट हवी आहे आणि मी म्हणाले की आशिया कपची ट्रॉफी आपल्या घरी आणं. आणि अभिषेकने हे वचन पूर्ण केले आहे, असे कोमल सांगते. कोमल पुढे म्हणाली, मला माझ्या भावाचे सर्व सामने पाहायला आवडते आणि त्याच्या लग्नानंतरही मी त्याच्या सर्व सामने पाहत राहीन.
advertisement
मी आणि माझी आई शेवटच्या सामन्यासाठी दुबईत होतो, पण यावेळी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही याबद्दल मी थोडी निराश आहे.आमच्या संपूर्ण संघाने संपूर्ण देशाला एक उत्तम भेट दिली,असे तिने सांगितले. भारताने पाकिस्तानकडून घेतलेल्या बदलाबद्दल विचारले असता ती म्हणाली,आम्ही पाकिस्तानला हरवले आणि ट्रॉफी घरी आणली आणि त्यांना यापेक्षा जास्त उत्तरांची गरज नाही.
advertisement
अभिषेकच्या आईने सांगितले की, जेव्हा जेव्हा मुलगा मोठी कामगिरी करतो तेव्हा ती आईसाठी खूप आनंदाची गोष्ट असते, पण त्याची मेहनत पाहून मी आधीच भाकित केले होते की तो नक्कीच काहीतरी मोठे साध्य करेल. एकीकडे, घरी लग्न असते आणि दुसरीकडे, विजयाचे आनंद आणि अभिनंदन असते. बाबाजींनी आपल्याला एकाच वेळी दोन मोठ्या आनंदाने आशीर्वाद दिला आहे,असे त्या म्हणतात.
advertisement
अभिषेक शर्माची कामगिरी
अभिषेक शर्माने सात सामन्यांमध्ये 314 धावा करून टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले. या काळात त्याने तीन अर्धशतके झळकावली आणि त्याचा सर्वोच्च धावसंख्या 75 होती.त्याने 44.85 च्या सरासरीने आणि 200च्या स्ट्राईक रेटने धावा करत, बहुतेक सामन्यांमध्ये भारताला चांगली सुरुवात करून दिली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup विजयानंतर अभिषेक शर्माच्या घरात लगीनघाई, दोन दिवसांनी सनई चौघडा वाजणार
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement