Rinku Singh : जे मनात ठरवलं तेच झालं! 6 सप्टेंबरला चिठ्ठीवर लिहिलेली गोष्ट ठरली खरी! रिंकू सिंहचा Gods Plan
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rinku Singh manifestation : टीम इंडियाचा युवा फिनिशर रिंकू सिंग याचा गॉड्स प्लॅन पुन्हा खरा ठरला आहे. रिंकू सिंग याने 23 दिवसापूर्वी जे लिहिलं ते खरं ठरलंय.
Rinku Singh manifestation On Asia Cup Final : कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताला विजयासाठी फक्त एका रनची गरज असताना, रिंकू सिंग फक्त एका बॉलचा सामना केला आणि त्यावर फोर मारून टीम इंडियाला विक्रमी नववं आशिया कपचं टायटल जिंकून दिलं. आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वीच रिंकू सिंग याने भारतासाठी विजयी रन करण्याची आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती आणि रविवारी रात्री दुबईतील अंतिम मॅचमध्ये त्याचं हे स्वप्न सत्यात उतरल्याचं पहायला मिळालं.
रिंकूच्या बॅटमधून विनिंग रन
27 वर्षीय रिंकू सिंगने या स्पर्धेपूर्वीच हाय-प्रेशर मॅचमध्ये भारतासाठी मॅच संपवणारा खेळाडू होण्याची इच्छा व्यक्त केली होती. एशिया कप फायनलमध्ये पहिल्यांदाच बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रिंकूने शांतपणे हॅरिस रौफच्या बॉलवर मिड-ऑनवरून फ्लिक केला आणि नाट्यमय पद्धतीने विजय निश्चित केला होता. आशिया कपच्या फायनलमध्ये आपल्या बॅटमधून विनिंग रन येणार, असं रिंकूने 6 सप्टेंबर रोजी एका चिठ्ठीवर लिहिलं होतं आणि तेच खरं झाल्याचं पहायला मिळालं.
advertisement
Rinku singh out of nowhere , hitting the winning runs. God’s plan
pic.twitter.com/FTyJ4fnoQ7
— Bihar_se_hai (@Bihar_se_hai) September 28, 2025
टीम जिंकली आणि मला खूप आनंद झाला
मॅचनंतर आनंदित झालेल्या रिंकू सिंगने सांगितलं, दुसरं काही महत्त्वाचं नाही. हा एक बॉल महत्त्वाचा होता. एक रन हवा होता. मी फोर मारला. मी एक फिनिशर आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. टीम जिंकली आणि मला खूप आनंद झाला, असं रिंकू सिंग म्हणाला. त्यानंतर जसप्रीत बुमराहची पत्नी आणि समालोकच संजना गणेशन हिने रिंकूने लिहिलेली चिठ्ठी सर्वांना दाखवली.
advertisement
On 6th September, Rinku Singh manifested to hit winning runs in final and Tilak Verma to score in final and win
They have walked the talk pic.twitter.com/0E6PD66woo
— S.Bhai33 (@HPstanno1) September 28, 2025
तिलक वर्माची चिठ्ठी खरी
advertisement
दरम्यान, रिंकू सिंगसह तिलक वर्माने देखील लिहिलेली चिठ्ठी खरी ठरली. फायनल सामन्यात रन्स स्कोर करणे आणि टीम इंडिया जिंकवून देणं, हे तिलक वर्माने चिठ्ठीत लिहिलं होतं. तेच खरं देखील झाल्याचं पहायला मिळतंय. संजना गणेशन हिने तिलक वर्माची देखील चिठ्ठी दाखवली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 10:53 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rinku Singh : जे मनात ठरवलं तेच झालं! 6 सप्टेंबरला चिठ्ठीवर लिहिलेली गोष्ट ठरली खरी! रिंकू सिंहचा Gods Plan