हार्दिक पांड्यामुळे BCCI ला घ्यावा लागला तडकाफडकी निर्णय, अखेरच्या क्षणी स्टेडियम बदललं! पण कारण काय?

Last Updated:

SMAT Match shifted due to Hardik Pandya : सैयद मुश्ताक अली ट्रॉफीतील सामना अधिक सुरक्षित असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Rajiv Gandhi International Stadium) हलवण्यात आला.

SMAT Match shifted due to Hardik Pandya
SMAT Match shifted due to Hardik Pandya
Hardik Pandya In SMAT Match : सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध अशा सय्यद मुश्ताक अली टुर्नानेंटला (Syed Mushtaq Ali Trophy) सुरुवात झाली आहे. या टुर्नामेंटमध्ये हार्दिक पांड्या, अभिषेक शर्मा, अर्जुन तेंडूलकर यासह इतर अनेक खेळाडू आपली कामिगिरीचं प्रदर्शन करत आहेत. अशातच आता नुकताच दुखापतीमधून बरा झालेल्या हार्दिक पांड्यामुळे बीसीसीआयची मोठी कोंडी झाल्याचं पहायला मिळालं. बडोदाकडून खेळत असलेल्या हार्दिक पांड्याच्या संघाने गुजरातविरुद्ध खेळला आणि त्यात बडोदा संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. मात्र, पुढच्या सामन्यात बीसीसीआयला मोठा निर्णय घ्यावा लागला.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीतील सामना हलवला

भारताचा स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला पाहण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे आयोजकांना गुरुवारी मोठा निर्णय घ्यावा लागला. हैदराबाद येथील जिमखाना मैदानासारख्या सामान्य ठिकाणाहून सैयद मुश्ताक अली ट्रॉफीतील सामना अधिक सुरक्षित असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Rajiv Gandhi International Stadium) हलवण्यात आला.
advertisement

अनपेक्षित गर्दी आणि सुरक्षेती चिंता

हार्दिकच्या उपस्थितीमुळे झालेली अनपेक्षित गर्दी आणि सुरक्षेच्या चिंतेमुळे सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. दुखापतीतून सावरल्यानंतरचा हार्दिकचा हा केवळ दुसराच स्पर्धात्मक सामना होता. आगामी 5 मॅचच्या टी-20 सीरीजमध्ये तो 9 डिसेंबरपासून कटक येथे सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.
advertisement

प्रेक्षकांची संख्या अंदाजापेक्षा खूप जास्त

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संघ थांबलेले हॉटेल, सराव नेट आणि तिकीट खिडक्यांजवळ नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. ही गर्दी स्थानिक मॅचेसच्या प्रेक्षकांच्या संख्येपेक्षा खूप जास्त होती. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रेक्षकांची संख्या आमच्या अंदाजापेक्षा खूप जास्त होती. सुरक्षा आणि सामना सुरळीत पार पाडण्यासाठी आम्ही सामना राजीव गांधी स्टेडियममध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. पंजाबविरुद्ध नाबाद 77 धावा केल्यानंतर, हार्दिकने गुजरातविरुद्ध 10 धावा केल्या आणि एक विकेट घेतली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हार्दिक पांड्यामुळे BCCI ला घ्यावा लागला तडकाफडकी निर्णय, अखेरच्या क्षणी स्टेडियम बदललं! पण कारण काय?
Next Article
advertisement
Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement