अमरावती : मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून विचलित होत आहे. यातूनच बाहेर पडण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक आदर्श पाऊल उचलले आहे. या गावात दररोज संध्याकाळी ठीक सात वाजता सायरन वाजवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची आठवण करून दिली जाते. सायरन वाजताच संपूर्ण गावात मोबाईल आणि टीव्ही बंद केले जातात, तर सात ते नऊ हा वेळ फक्त अभ्यासासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.



