जालना : शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी सुरतेमधून धनदौलत जमा केल्याचे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सुरतेप्रमाणेच महाराजांनी जालना शहरातून देखील स्वराज्य उभारणीसाठी धनदौलत गोळा केली होती. महाराजांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात ते जालना शहरामध्ये आले असल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत. ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांनी याबाबत माहिती देली आहे.



