सध्याचं वातावरण प्रदुषित झाल्याने पर्यावरणाचं चक्र उलटं फिरलं आहे. त्यातच आता धुकं, अतिधंडी, दवामुळे सिंधुदुर्ग मधील देवगड तालुक्यातील आंब्याचा मोहोर करपला आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांवर मोठं संकट उद्भवलं आहे. त्यामुळे मिठमुंबरी गावातील शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीसाठी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.



