ठाकरे बंधूंची युती झाल्यावर मनसेचा पहिलाच मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्वाची आहे, त्यामुळे आपल्याला मुंबई वाचवायची आहे." असा संदेश राज ठाकरेंनी मेळाव्यात दिला.
Last Updated: Dec 29, 2025, 17:56 IST


