सोलापूर : उच्च शिक्षण घेऊनही अनेक तरुण नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घेतात. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज गावातील 29 वर्षीय उझेब इक्बाल पाटील यांनी वेगळी वाट निवडत मत्स्यपालन व्यवसायात यश मिळवले आहे. बी.ए.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता त्यांनी मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आणि अवघ्या दोन वर्षांत तब्बल 60 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.



