एअरपोर्टवर विमान उतरताच एअरफोर्सने टाकले बॉम्ब, 40 लोकांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Attack on UAE Plane: संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईचं एक विमान बॉम्बने उडवल्याची घटना समोर आली आहे. या विमानाने विमानतळावर लँड केल्यानंतर सुदानच्या हवाई दलाने तत्काळ हल्ला सुरू केला.
संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईचं एक विमान बॉम्बने उडवल्याची घटना समोर आली आहे. या विमानाने विमानतळावर लँड केल्यानंतर सुदानच्या हवाई दलाने तत्काळ हल्ला सुरू केला. या हल्ल्यात हे विमान पूर्णपणे जळून खाक झालं आहे. या हल्ल्यात किमान ४० लोक ठार झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदानच्या सरकारी टीव्ही चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात कोलंबियन भाडोत्री सैनिक होते. सुदानने बुधवारी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) च्या नियंत्रणाखाली असलेल्या विमानतळावर हा हल्ला झाला. एप्रिल २०२३ पासून सुदानी सैन्य आणि आरएसएफ यांच्यात युद्ध सुरू आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, न्याला विमानतळावर उतरताच झालेल्या बॉम्बस्फोटात यूएईचे हे विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या विमानाने आखाती देशातील एका विमानतळावरून उड्डाण केले होते आणि त्यात डझनभर परदेशी सैनिक आणि आरएसएफसाठी शस्त्रे आणि उपकरणे होती. आरएसएफने दारफूरचा बहुतेक भाग व्यापला आहे. जनरल अब्देल फताह अल-बुरहान यांच्या नेतृत्वाखालील सुदानच्या सैन्याने युएईवर न्याला विमानतळाद्वारे आरएसएफला ड्रोनसारखी शस्त्रे पुरवल्याचा आरोप बराच काळ केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिकन अधिकारी आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या अहवालात अन्यथा सूचित केले असले तरी, युएईने या आरोपांना नकार दिला आहे.
advertisement
कोलंबिया देखील लक्ष ठेवून आहे
कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर सांगितले की त्यांचे सरकार हल्ल्यात किती कोलंबियन लोक मारले गेले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी लिहिले की, 'त्यांचे मृतदेह परत आणता येतील का? ते आम्ही पाहू.' पेट्रो यांनी भाडोत्री लष्करी कारवायांवर बंदी घालण्याची मागणी केली. कोलंबियन भाडोत्री सैनिक, जे बहुतेक माजी सैनिक आहेत. ज्यांनी यापूर्वी येमेन आणि आखाती देशांमध्ये यूएईसाठी अनेकदा युद्ध केलं आहे. २०२४ च्या अखेरीपासून दारफुरमध्ये कोलंबियन सैनिकांच्या उपस्थितीची पुष्टी संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांनी केली आहे.
advertisement
दक्षिण दारफुरची राजधानी, न्याला विमानतळ गेल्या वर्षी आरएसएफच्या ताब्यात आलं. सुदानच्या लष्कराचा दावा आहे की, आरएसएफ परदेशी शस्त्रे आणि सोने तस्करी करण्यासाठी या विमानतळाचा वापर करते.
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 07, 2025 12:29 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
एअरपोर्टवर विमान उतरताच एअरफोर्सने टाकले बॉम्ब, 40 लोकांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?


