या मंदिरात वर्षातून एकदाच भरते जत्रा; रात्री इथं कुणीच थांबत नाही, कारण...
- Published by:News18 Marathi
Last Updated:
इथं वर्षातून एकदा हजारो नव्हे तर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दिवसा मोठी जत्राही भरते ज्यात दुकाने सजलेली असतात पण रात्रीची आरती होताच मंदिर पूर्णपणे निर्जन होतं.
दीप दंडोतिया, प्रतिनिधी/ भोपाळ : कित्येक गाव, मंदिरात जत्रा भरतात. जत्रा म्हणजे दिवसरात्र गजबज. रात्रीही लोकांची गर्दी असते. पण भारतातील एक असं गाव जिथल्या मंदिरात वर्षातून फक्त एकदाच जत्रा भरते. पण रात्री इथं थांबायची हिंमत कुणाचीच होत नाही. इथं रात्री कुणीच थांबत नाही.
मध्य प्रदेशच्या श्योपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 108 किलोमीटर अंतरावर वीरपूर तहसील परिसरातील श्यामपूर आणि जामुर्डी ग्रामपंचायतींमधील चंबळ नदीला लागून पार्वती मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. वर्षातून एकदा भादो महिन्यातील अमावास्येनंतरच्या पहिल्या सोमवारी दिवसभरात येथे मोठी जत्रा भरते.
advertisement
इथं वर्षातून एकदा हजारो नव्हे तर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दिवसा मोठी जत्राही भरते ज्यात दुकाने सजलेली असतात पण रात्रीची आरती होताच मंदिर पूर्णपणे निर्जन होतं. रात्रीची आरती होताच कोणी चुकूनही इथं थांबत नाही.
यामागे नेमकं काय कारण आहे त्याआधी या मंदिराची स्थापना कशी झाली ते पाहूयात.
कशी झाली मंदिराची स्थापना?
शेकडो वर्षांपूर्वी चंबळच्या दऱ्याखोऱ्यात गुरेढोरे चरत असताना एका गुराख्याला एक मूर्ती दिसल्याचं परिसरातील ज्येष्ठ सांगतात. मेंढपाळाने मूर्ती उचलली तेव्हा मूर्तीतून आवाज आला, 'तू मला घेऊन चालला आहेस, मीही तुझ्याबरोबर येईन, पण तू मला जिथं ठेवशील, तिथून मी जाणार नाही.
advertisement
मेंढपाळाने हे मान्य केलं आणि ती मूर्ती उचलून खांद्यावर ठेवली. त्याने मूर्ती लांबवर नेली आणि जामुडी गावाजवळ आल्यावर तहान लागल्यावर तो मूर्तीने जे सांगितलं ते विसरला. त्याने मूर्ती विहिरीच्या काठी ठेवली आणि पाणी पिण्यास सुरुवात केली. यानंतर तेथे मूर्तीची स्थापना झाली आणि मेंढपाळाच्या सर्व प्रयत्नांनंतरही ती तिथून हलली नाही. त्यावेळी दरोडेखोरांमुळे प्रत्येकाची दरीत जाण्याची हिंमत होत नव्हती.
advertisement
या ठिकाणाबाबत कथा
दुवावली गावातील रहिवासी गौरी चरण शर्मा सांगतात की, राजस्थानमधील एका श्रीमंत व्यक्तीचा एकुलता एक मुलगा साप चावल्याने मरण पावला होता. त्याचा मृतदेह चंबळ नदीत वाहून नेला. तरंगत मृतदेह जामुर्डी गावाजवळ पोहोचला, तेव्हा आईने स्वप्न दाखवून पुजाऱ्याला मृतदेह तिच्या जागी आणून पुन्हा जिवंत करण्याचा आदेश दिला. मृतदेह तेथे आणताच त्यावर पाणी शिंपडताच तो जिवंत झाला. ही बातमी वडिलांपर्यंत पोहोचताच ते अमाप संपत्ती घेऊन तिथं आले आणि मातेचे मंदिर बांधून त्यांनी उरलेली संपत्ती विहिरीत टाकून दिली. तेव्हापासून परिसरात कोणाला साप किंवा विंचू चावला तर देवी पार्वतीच्या नावाने नुसती विभूती लावल्याने ती व्यक्ती मरत नाही. याशिवाय माता मंदिरात भाविक ज्या काही इच्छा ठेवतात, त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात.
advertisement
रात्री लोक का थांबत नाही
लोकांचे म्हणणं आहे की तिथं कोणी राहिला तर तो वाचणार नाही कारण या रात्री देवीच्या दर्शनासाठी भूत, जिन, साप, विंचू, सिंह इत्यादी प्राणी मंदिरात येतात, जे दिसल्यास मानवाला जिवंत सोडत नाहीत. त्यांना तिथे.
Location :
Delhi
First Published :
September 13, 2024 3:34 PM IST