advertisement

Soyabean Rate : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तुरीला काय मिळाला भाव?

Last Updated:

राज्यातील शेतीमालाच्या बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कापसाचे दर कमी झाले असून तुरीचे दर वधारले आहेत.

+
News18

News18

जालना : राज्यातील शेतीमालाच्या बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कापसाचे दर कमी झाले असून तुरीचे दर वधारले आहेत. राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि कांदा यांसारख्या महत्त्वाच्या पिकांना किती भाव मिळतोय, कोणत्या पिकाची आवक कशी आहे पाहुयात.
कापसाचे वधारलेले दर कमी झाले आहेत. कापसाला कमीत कमी 7300 ते जास्तीत जास्त 8088 रुपये दर मिळत आहे. राज्यात सर्वाधिक 3500 क्विंटल कापसाची आवक सावनेर बाजार समितीत झाली, तर 8088 रुपये एवढा सर्वाधिक दर अकोला बोरगाव मंजू बाजार समितीत मिळाला.
advertisement
सोयाबीनच्या दरामध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळत आहे. मध्यंतरी कमी झालेले सोयाबीनचे दर आता वधारले आहेत. सोयाबीनला सर्वाधिक 6500 प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे, तर सोयाबीनचा कमीत कमी दर 3500 रुपयांपर्यंत आहे. लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक 8789 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. राज्यातील सर्वाधिक 6650 रुपयांचा दर वाशिम बाजार समितीमध्ये मिळाला.
advertisement
तुरीच्या दराने हमीभावाचा पल्ला ओलांडला असून तुरीला 8600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत असल्याचं पाहायला मिळतं. राज्यात सर्वाधिक 7730 क्विंटल तुरीची आवक जालना बाजार समितीमध्ये झाली. करमाळा बाजार समितीमध्ये आलेल्या काळ्या रंगाच्या तुरीला 8801 रुपये एवढा विक्रमी दर मिळाल्याचे पाहायला मिळालं.
कांद्याच्या दरामध्ये दर्जा नुसार मोठी तफावत आढळत आहे. कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटलपासून तब्बल 2800 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. राज्यातील सर्वाधिक 40,000 क्विंटल कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये झाली. इथे कांद्याला 100 ते 2000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Soyabean Rate : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तुरीला काय मिळाला भाव?
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement