TRENDING:

कॉर्पोरेट नोकरी सोडली! फक्त १२ हाजार रुपये भांडवल गुंतवलं, या शेतीतून प्रदीपनं उभं केलं लाखोंचं साम्राज्य

Last Updated:

Success Story : जिद्द, धैर्य आणि निसर्गावरचा विश्वास असेल, तर अगदी कमी भांडवलातूनही मोठं यश उभं करता येतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जिद्द, धैर्य आणि निसर्गावरचा विश्वास असेल, तर अगदी कमी भांडवलातूनही मोठं यश उभं करता येतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे तामिळनाडूतील वेल्लोरचे प्रदीप कुमार. केवळ १२ हजार रुपयांत सुरू केलेल्या त्यांच्या ‘फूड फॉरेस्ट’ने आज हजारो ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे आणि नैसर्गिक शेतीचा आदर्श ठरला आहे.
success story
success story
advertisement

कॉर्पोरेट करिअर सोडून शेतीकडे वळण्याचा निर्णय

प्रदीप कुमार यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण करून २०१४ मध्ये एल अँड टी (L&T) मध्ये कॅम्पस प्लेसमेंट मिळवले. त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर अभियंता म्हणून काम केले. त्यानंतर ते टेरेक्समध्ये सर्व्हिस इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. करिअर उत्तम सुरू असतानाच, आईच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर आणि स्वतःलाही किडनी स्टोनचा त्रास झाल्यानंतर त्यांनी आयुष्याचा पुनर्विचार केला. निरोगी जीवनशैली असूनही आजार का होत आहेत, याचा शोध घेताना त्यांनी अन्नातील रसायनांवर लक्ष केंद्रित केले. प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ नम्मलवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

advertisement

पडीक जमिनीतून उभा राहिला ‘फूड फॉरेस्ट’

गावी परतल्यावर प्रदीप यांना समजले की रासायनिक शेतीमुळे जमीन पूर्णपणे निष्प्रभ झाली आहे. सुरुवातीची एक-दोन वर्षे काहीच पीक आले नाही. मात्र त्यांनी हार मानली नाही. पिकांपेक्षा जमिनीची सुपीकता वाढवण्यावर त्यांनी भर दिला. देशी बियाणे वापरून आणि त्याच रोपांचे खत तयार करून त्यांनी जमिनीला पुन्हा जिवंत केले. हळूहळू पक्षी, गांडुळे परत आली आणि त्या ओसाड जमिनीचे रूपांतर एका समृद्ध ‘अन्नवनात’ झाले.

advertisement

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून थेट विक्री

केवळ २ सेंट जमिनीपासून सुरुवात केलेल्या प्रदीप यांनी आज ४० सेंटपर्यंत विस्तार केला आहे. त्यांच्या शेतात टोमॅटो, वांगी, बाजरीसह सुमारे ८०० देशी बियाण्यांच्या जातींची लागवड केली जाते. ते कोणतेही मध्यस्थ न ठेवता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून थेट ग्राहकांशी संपर्क साधून विक्री करतात. त्यांच्या शेतीची गुणवत्ता इतकी उत्कृष्ट आहे की, भेंडीच्या एका रोपाला साधारण १० ते ३० फळे येतात, तर त्यांच्या शेतात हे प्रमाण १२० पर्यंत पोहोचते. याशिवाय, ते दरवर्षी ‘बीज महोत्सव’ आयोजित करतात, ज्याला हजारो लोक भेट देतात.

advertisement

१२ हजारांपासून लाखोंपर्यंतचा प्रवास

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

अत्यंत कमी भांडवलातून सुरू झालेला हा उपक्रम आज यशस्वी व्यवसायात रूपांतरित झाला आहे. प्रदीप दरवर्षी बियाण्यांमधून सुमारे ३ लाख रुपये आणि भाजीपाल्यातून २ लाख रुपये कमावतात. उत्पादन वाया जाऊ नये म्हणून ते लोणची, प्युरी आणि सुक्या भाज्यांमध्ये त्याचे रूपांतर करतात. आज १० हजारांहून अधिक ग्राहक त्यांच्या उत्पादनांवर विश्वास ठेवतात.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
कॉर्पोरेट नोकरी सोडली! फक्त १२ हाजार रुपये भांडवल गुंतवलं, या शेतीतून प्रदीपनं उभं केलं लाखोंचं साम्राज्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल