Weather Alert: धोका वाढला! 11 ते 4 घरीच थांबा, महाराष्ट्रावर पुन्हा संकट, 24 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज पुन्हा कमाल तापमानाचा पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता आहे.
आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ. " width="1600" height="900" /> महाराष्ट्रात मार्चच्या शेवटच्या टप्प्यात उष्णता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात उष्णतेच्या लाटे सोबत अवकाळी संकट देखील घोंघावतं आहे. पण आता मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होईल. 27 मार्चला राज्याच्या बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील, तर कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान जाणवेल. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
महाराष्ट्रातून अवकाळीचा धोका कमी झाला आहे. मात्र विदर्भात संकट कायम आहे. आज नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तर तापमानाचा पारा चढणार असून कमाल तापमान 38-41 अंशांवर जाईल. अकोल्यात सर्वोच्च तापमानाची नोंद होईल.
advertisement








