सीताराम पाटील यांनी एम.कॉमपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर खाकी वर्दीचं स्वप्न पाहून पोलीस भरतीची तयारी केली. परंतु, यशानं थोडक्यात हुलकावणी दिली. पुढे पुणे-मुंबईत जाऊन नोकरीचा विचार केला. वर्षभर नोकरीचा शोध घेतला परंतु पाहिजे तशी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे शेवटी थेट गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला.
APMC Market: हळदीला मिळाला उच्चांकी दर, आले आणि डाळिंबाची काय स्थिती? इथं चेक करा
advertisement
अर्ध्या एकरात मिरची शेती
सीताराम पाटील यांनी अर्ध्या एकरात एक्सपोर्ट दर्जाची जी 4 जातीची हिरवी मिरची लागवड केली. 5 बाय 1.50 फूट अंतरावर लागवड करण्यात आली असून या लागवडीसाठी सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च आला आहे. या मिरचीची विक्री एका खाजगी कंपनीसोबत करार पद्धतीने करण्यात येत असून प्रतिकिलो 40 रुपये दर मिळत आहे.
दरम्यान, या अर्धा एकर मिरची शेतीतून खर्च वजा जाता सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत नफा अपेक्षित असल्याचे सीताराम सांगतात. तसेच उच्चशिक्षित तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय किंवा शेतीकडे वळावे. वडिलोपार्जित जमीन असेल तर आधुनिक शेती करून नोकरीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळवता येते, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे.





