राज्य सरकारने पुढे जाऊन अनुदान ई - पीक पाहणीवर पिकांची नोंद केलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी तो निर्णय पुन्हा मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई - पीक पाहणीची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मात्र ती फक्त एक घोषणाच राहिली. ई - पीक पाहणी अॅपवर नोंद करूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही.
advertisement
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनुदान वाटप करण्यात आले. परंतु चुकीची माहिती भरलेल्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे आता आम्हाला अनुदान कधी मिळणार? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
सोयाबीनचे उत्पादन घटले
सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहे. यंदाच्या वर्षी असमतोल वातावरणामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच उत्पादनातही घट झाली आहे. प्रति एकर 4 ते 5 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन निघत असते. त्यासाठी 16, 400 रुपये किमान खर्च येत असतो. सध्या सोयाबीन विक्रीमधून 12 ते 16 हजार रुपये मिळत असल्याने तब्बल 400 ते 4000 रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
