राज्य सरकारने खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई मिळाल्यानंतर येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे आणि शेतीसंबंधित खर्चासाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजार रुपये (कमाल तीन हेक्टरपर्यंत) अशी आर्थिक मदत दिली जाणार असून, यासाठी १,७६५ कोटी २२ लाख ९२ हजार रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. ही माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
advertisement
जिल्हानिहाय किती मदत मिळणार?
सातारा जिल्हा: १४,६४३ शेतकऱ्यांच्या ५,८०३.५५ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी ५ कोटी ८० लाख ३६ हजार रुपये वितरित केले जाणार आहेत.
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर : १६,५९,२९३ शेतकऱ्यांच्या १२,११,५९४ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी १,२११ कोटी ५४ लाख ९० हजार रुपये मंजूर झाले आहेत.
अमरावती जिल्हा: ४,९०,९११ शेतकऱ्यांच्या ५,४७,८७६.६५ हेक्टर क्षेत्रातील नुकसान भरपाई म्हणून ५४७ कोटी ८७ लाख ६६ हजार रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
तसेच अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राचा आढावा घेतल्यानंतर, राज्य शासनाने वाढीव एक हेक्टर मर्यादेत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
विभागनिहाय मदत वितरण
जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागांतील शेतकऱ्यांना एकूण १२० कोटी ३३ लाख ८७ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
वर्धा जिल्हा: २१,३९२ शेतकऱ्यांच्या १५,५१२.११ हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी १३ कोटी २० लाख ३८ हजार रुपये मंजूर.
अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला आणि यवतमाळ : ८६,५८२ शेतकऱ्यांच्या ७१,३३३.९० हेक्टरवरील नुकसानीसाठी ६१ कोटी ८१ लाख ६४ हजार रुपये वितरित होणार.
धाराशिव जिल्हा: ६३,४१४ शेतकऱ्यांच्या ४३,१६२.३१ हेक्टरवरील नुकसानीसाठी ४२ कोटी ४५ लाख ९३ हजार रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
