TRENDING:

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २, ५४० कोटींचा निधी आला, जिल्हानिहाय किती पैसे मिळणार?

Last Updated:

Agriculture News : नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यास राज्य शासनाने पहिलं प्राधान्य दिले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार रुपयांच्या मदत निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
Agriculture News
Agriculture News
advertisement

राज्य सरकारने खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई मिळाल्यानंतर येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे आणि शेतीसंबंधित खर्चासाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजार रुपये (कमाल तीन हेक्टरपर्यंत) अशी आर्थिक मदत दिली जाणार असून, यासाठी १,७६५ कोटी २२ लाख ९२ हजार रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. ही माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

advertisement

जिल्हानिहाय किती मदत मिळणार?

सातारा जिल्हा: १४,६४३ शेतकऱ्यांच्या ५,८०३.५५ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी ५ कोटी ८० लाख ३६ हजार रुपये वितरित केले जाणार आहेत.

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर : १६,५९,२९३ शेतकऱ्यांच्या १२,११,५९४ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी १,२११ कोटी ५४ लाख ९० हजार रुपये मंजूर झाले आहेत.

अमरावती जिल्हा: ४,९०,९११ शेतकऱ्यांच्या ५,४७,८७६.६५ हेक्टर क्षेत्रातील नुकसान भरपाई म्हणून ५४७ कोटी ८७ लाख ६६ हजार रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

advertisement

तसेच अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राचा आढावा घेतल्यानंतर, राज्य शासनाने वाढीव एक हेक्टर मर्यादेत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

विभागनिहाय मदत वितरण

जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागांतील शेतकऱ्यांना एकूण १२० कोटी ३३ लाख ८७ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

advertisement

वर्धा जिल्हा: २१,३९२ शेतकऱ्यांच्या १५,५१२.११ हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी १३ कोटी २० लाख ३८ हजार रुपये मंजूर.

अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला आणि यवतमाळ : ८६,५८२ शेतकऱ्यांच्या ७१,३३३.९० हेक्टरवरील नुकसानीसाठी ६१ कोटी ८१ लाख ६४ हजार रुपये वितरित होणार.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

धाराशिव जिल्हा: ६३,४१४ शेतकऱ्यांच्या ४३,१६२.३१ हेक्टरवरील नुकसानीसाठी ४२ कोटी ४५ लाख ९३ हजार रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २, ५४० कोटींचा निधी आला, जिल्हानिहाय किती पैसे मिळणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल