पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. जे. तळेकर म्हणाले, "पावसाळ्यामध्ये आपण आपल्या पशुधनाची काळजी घेणं फार गरजेचं असतं. पावसाळ्यामध्ये सततच्या ओलाव्यामुळे मोठ्या प्रमाणात माशा आणि चिलटांसाखरे कीटक फिरतात. हे कीटक जनावरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. कीटकांमुळे जनावरांना विविध आजार होण्याची शक्यता असते."
Milk Rate: दूध उत्पादक शेतकरी होणार मालामाल! पुणे जिल्हा दूध संघाने घेतला 'हा' निर्णय
advertisement
डॉ. तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात आपल्या गोठ्यातील जनावरे निरोगी रहावीत यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जनावरांचा गोठा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यासाठी निर्जंतुकीकरणाची औषधे वापरली पाहिजेत. जनावरांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आंघोळ घातली पाहिजे. जेणेकरून त्यांच्या अंगावर गोचिड, माशा, चिलटांसारखे कीटक वास्तव्य करणार नाहीत. याशिवाय पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. माणसाप्रमाणे जनावरांसाठी देखील वेगवेगळ्या लसी असतात. विशेषत: पावसाळ्यात लंपी या आजारासाठी लसीकरण करून घेणे फार गरजेचं आहे.
स्वच्छतेसोबतच पशुधनाचा आहार देखील फार महत्त्वाचा आहे. दुभती जनावरे, कष्टाची कामे करणारे बैल आणि गोठ्यातील इतर जनावरांना पावसाळ्यात हिरवा चारा, कोरडा चारा किंवा बाजारात मिळणारे पशुखाद्य असा सकस आहार दिला पाहिजे. जर एखाद्या जनावरामध्ये बदल होत असल्याचं निदर्शनास आल्यास तत्काळ पशुवैद्यकाची मदत घेतली पाहिजे.