उन्हाळ्यातील प्रमुख नगदी पिकांमध्ये भुईमूगाचा समावेश होतो. हलक्या ते मध्यम जमिनीत भुईमूगाची लागवड चांगली होते. योग्य वेळी पेरणी केल्यास आणि ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते तसेच उत्पादनात वाढ होते. याशिवाय रोग आणि कीड नियंत्रणावर लक्ष दिल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो.
Success Story : 26 वर्षांची मेहनत अखेर लिंबाने केलं लखपती, आतापर्यंत 8000000 कमाई
advertisement
मका हे देखील उन्हाळ्यासाठी उपयुक्त पीक मानले जाते. कमी कालावधीत तयार होणाऱ्या या पिकाला बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. योग्य खत व्यवस्थापन, तणनियंत्रण आणि पाण्याचे नियोजन केल्यास मक्याचे उत्पादन अधिक वाढवता येते. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळ्यात मक्याच्या लागवडीकडे वळताना दिसत आहेत.
याशिवाय भाजीपाला पिकांनाही उन्हाळ्यात विशेष महत्त्व आहे. भेंडी, कारली, दोडका, काकडी, टरबूज आणि खरबूज यांसारखी पिके कमी कालावधीत तयार होतात आणि बाजारात त्यांना चांगला दर मिळतो. विशेषतः शहराच्या जवळील भागात भाजीपाल्याची मागणी अधिक असल्याने शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेचा फायदा मिळू शकतो.
उन्हाळ्यात शेती करताना ठिबक सिंचन, मल्चिंग आणि योग्य पीक निवड यावर भर दिल्यास कमी पाण्यातही भरघोस उत्पादन घेणे शक्य आहे. योग्य नियोजन, वेळेवर पाणी आणि खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उन्हाळ्यातील शेतीतून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात, असं कृषी तज्ज्ञ शरद राठोड सांगतात.





