'नवपंचम राजयोग' म्हणजे काय?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून पाचव्या आणि नवव्या भावात असतात, तेव्हा 'नवपंचम योग' तयार होतो. याला राजयोगाची श्रेणी दिली जाते कारण सूर्य हा आत्मविश्वास, सत्ता, मान-सन्मान आणि सरकारी क्षेत्राचा कारक आहे. तर गुरु हा ज्ञान, भाग्य, संपत्ती, विवाह आणि समृद्धीचा कारक आहे. जेव्हा हे दोन ग्रह 120 अंशांच्या कोनात येतात तेव्हा त्यांची शुभ ऊर्जा एकमेकांमध्ये मिसळते. सध्या गुरु मिथुन राशीत असून सूर्य कुंभ राशीत विराजमान आहे. या परस्पर संबंधामुळे निर्माण झालेला हा योग व्यक्तीला बौद्धिक क्षमता आणि भाग्याची भक्कम साथ मिळवून देतो.
advertisement
या 3 राशींना होणार अफाट फायदा
मिथुन
तुमच्याच राशीत गुरु विराजमान असल्याने हा राजयोग तुमच्यासाठी 'सुवर्णकाळ' घेऊन आला आहे. नोकरीच्या नवीन आणि उत्तम संधी चालून येतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात मोठी गुंतवणूक फलदायी ठरेल. रखडलेले पैसे अचानक परत मिळतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकाल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या प्रोजेक्टवर काम करत आहात, त्यात आता यश मिळेल. शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात असलेल्यांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. जुन्या आजारातून सुटका होईल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याचे प्रबळ संकेत आहेत.
मकर
मकर राशीच्या जातकांसाठी हा राजयोग धनसंपत्ती वाढवणारा ठरेल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील. शेअर मार्केट किंवा लॉटरीतून आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. समाजातील तुमची प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
