श्री तुलसी चालीसा
श्री तुलसी महारानी, करूं विनय सिरनाय।
जो मम हो संकट विकट, दीजै मात नशाय।।
नमो नमो तुलसी महारानी, महिमा अमित न जाय बखानी।
दियो विष्णु तुमको सनमाना, जग में छायो सुयश महाना।।
विष्णुप्रिया जय जयति भवानि, तिहूँ लोक की हो सुखखानी।
भगवत पूजा कर जो कोई, बिना तुम्हारे सफल न होई।।
advertisement
जिन घर तव नहिं होय निवासा, उस पर करहिं विष्णु नहिं बासा।
करे सदा जो तव नित सुमिरन, तेहिके काज होय सब पूरन।।
कातिक मास महात्म तुम्हारा, ताको जानत सब संसारा।
तव पूजन जो करैं कुंवारी, पावै सुन्दर वर सुकुमारी।।
कर जो पूजन नितप्रति नारी, सुख सम्पत्ति से होय सुखारी।
वृद्धा नारी करै जो पूजन, मिले भक्ति होवै पुलकित मन।।
श्रद्धा से पूजै जो कोई, भवनिधि से तर जावै सोई।
कथा भागवत यज्ञ करावै, तुम बिन नहीं सफलता पावै।।
छायो तब प्रताप जगभारी, ध्यावत तुमहिं सकल चितधारी।
तुम्हीं मात यंत्रन तंत्रन, सकल काज सिधि होवै क्षण में।।
औषधि रूप आप हो माता, सब जग में तव यश विख्याता।
देव रिषी मुनि औ तपधारी, करत सदा तव जय जयकारी।।
वेद पुरानन तव यश गाया, महिमा अगम पार नहिं पाया।
नमो नमो जै जै सुखकारनि, नमो नमो जै दुखनिवारनि।।
नमो नमो सुखसम्पति देनी, नमो नमो अघ काटन छेनी।
नमो नमो भक्तन दुःख हरनी, नमो नमो दुष्टन मद छेनी।।
नमो नमो भव पार उतारनि, नमो नमो परलोक सुधारनि।
नमो नमो निज भक्त उबारनि, नमो नमो जनकाज संवारनि।।
नमो नमो जय कुमति नशावनि, नमो नमो सुख उपजावनि।
जयति जयति जय तुलसीमाई, ध्याऊँ तुमको शीश नवाई।।
निजजन जानि मोहि अपनाओ, बिगड़े कारज आप बनाओ।
करूँ विनय मैं मात तुम्हारी, पूरण आशा करहु हमारी।।
शरण चरण कर जोरि मनाऊं, निशदिन तेरे ही गुण गाऊं।
करहु मात यह अब मोपर दाया, निर्मल होय सकल ममकाया।।
मंगू मात यह बर दीजै, सकल मनोरथ पूर्ण कीजै।
जनूं नहिं कुछ नेम अचारा, छमहु मात अपराध हमारा।।
बरह मास करै जो पूजा, ता सम जग में और न दूजा।
प्रथमहि गंगाजल मंगवावे, फिर सुन्दर स्नान करावे।।
चन्दन अक्षत पुष्प् चढ़ावे, धूप दीप नैवेद्य लगावे।
करे आचमन गंगा जल से, ध्यान करे हृदय निर्मल से।।
पाठ करे फिर चालीसा की, अस्तुति करे मात तुलसा की।
यह विधि पूजा करे हमेशा, ताके तन नहिं रहै क्लेशा।।
करै मास कार्तिक का साधन, सोवे नित पवित्र सिध हुई जाहीं।
है यह कथा महा सुखदाई, पढ़े सुने सो भव तर जाई।।
तुलसी मैया तुम कल्याणी, तुम्हरी महिमा सब जग जानी।
भाव ना तुझे माँ नित नित ध्यावे, गा गाकर मां तुझे रिझावे।।
यह श्री तुलसी चालीसा पाठ करे जो कोय।
गोविन्द सो फल पावही जो मन इच्छा होय।।
श्री तुळसी चालीसेचा अर्थ आणि महत्व
श्री तुळसी चालीसा हे तुळशी मातेचे गुणगान करणारे आणि तिच्या कृपेसाठी केलेली प्रार्थना आहे. या चाळीस चौपाईंमध्ये तुळशीच्या महत्त्वाची स्तुती केली आहे आणि भक्तांना मिळणाऱ्या लाभांचे वर्णन केले आहे.
तुळशीचे महत्त्व
तुळशी मातेची महिमा अमित आहे, तिचे वर्णन करणे शक्य नाही. भगवान विष्णूंनी तुळशीला मान दिला आहे, त्यामुळे तिची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे. तुळस ही विष्णू प्रिय आहे आणि ती तिन्ही लोकांमध्ये सुख देणारी आहे. तुळशीशिवाय केलेली कोणतीही भगवत पूजा सफल होत नाही. ज्या घरात तुळशीचा निवास नसतो, त्या घरात विष्णूचा वास नसतो.
भक्तांना मिळणारे लाभ
जो भक्तीभावाने नित्य तुळशीचे स्मरण करतो, त्याची सर्व कामे पूर्ण होतात. तुळशीची पूजा करणाऱ्या अविवाहित मुलींना उत्तम वर मिळतो. तुळशीची नित्य पूजा करणाऱ्या स्त्रिया सुख-संपत्तीने सुखी होतात. तुळस मातेची श्रद्धापूर्वक पूजा करणारा व्यक्ती भवसागर तरून जातो. तुळस ही यंत्र, तंत्र आणि औषधी रूपात सर्व जगात प्रसिद्ध आहे.
प्रार्थना आणि क्षमा
चालीसाच्या शेवटी भक्त तुळशी मातेला प्रार्थना करतो की, "हे माता! तुम्ही माझे सारे संकट दूर करा. मला तुमचा सेवक मानून माझा स्वीकार करा आणि माझी बिघडलेली कामे पूर्ण करा." माझ्याकडून झालेले सर्व अपराध क्षमा करा. जो व्यक्ती वर्षभर श्रद्धेने तुळशीची पूजा करतो, त्याच्या शरीरावरील सर्व क्लेश दूर होतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
