TRENDING:

पुढील ३ दिवसांत गुरु शुक्राची शक्तीशाली युती! 'या' राशींच्या लोकांकडे श्रीमंती येणार

Last Updated:

Astrology News : पितृपक्षाचा कालावधी संपल्यानंतर आता शारदीय नवरात्रौत्सवाचा मंगलप्रारंभ झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Astrology News
Astrology News
advertisement

मुंबई : पितृपक्षाचा कालावधी संपल्यानंतर आता शारदीय नवरात्रौत्सवाचा मंगलप्रारंभ झाला आहे. देवीचे आगमन मंदिरांपासून घराघरांत मोठ्या भक्तिभावाने होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहता, यंदाची नवरात्र अत्यंत खास ठरणार आहे. कारण या काळात गुरु आणि शुक्र ग्रहांची विशेष स्थिती निर्माण होत असून त्यामुळे एक शक्तिशाली योग तयार होणार आहे. हा योग काही राशींसाठी अत्यंत शुभफलदायी ठरेल. विशेषतः वृषभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांना या काळात भाग्याची साथ मिळणार आहे.

advertisement

शारदीय नवरात्रीतील ग्रहयोग

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह साधारणतः १३ महिन्यांनी आपली रास बदलतो. सध्या गुरु मिथुन राशीत भ्रमण करत असून वर्षभर तिथेच स्थिर राहणार आहे. या काळात तो विविध ग्रहांसोबत युती व दृष्टी निर्माण करून शुभ आणि अशुभ परिणाम घडवतो. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५:१६ वाजता गुरु आणि शुक्र ग्रह ४५ अंशांवर येऊन अर्धकेंद्र योग निर्माण करणार आहेत. त्या वेळी शुक्र सिंह राशीत केतूसोबत असेल. या योगामुळे काही राशींना विशेष लाभ होणार आहे.

advertisement

वृषभ

वृषभ राशीच्या जातकांसाठी हा योग अत्यंत सकारात्मक ठरेल. गुरु लग्नात असल्याने जीवनात आनंद, समाधान आणि स्थिरता वाढेल. कुटुंबातील संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि वैवाहिक जीवन अधिक सुखकर होईल. मालमत्ता, जमीन-जुमला किंवा घराशी संबंधित व्यवहारात लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी बढती किंवा पगारवाढीच्या संधी निर्माण होतील. दीर्घकाळ चालू असलेल्या अडचणींचा शेवट होईल. तसेच न्यायालयीन प्रकरणांतही दिलासा मिळू शकतो. गुरुच्या कृपेने सामाजिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

advertisement

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हा काळ अत्यंत शुभ मानला जात आहे. आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल, ज्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होईल. करिअरमध्ये यशस्वी होण्याची शक्यता आहे. स्पर्धा आणि आव्हानांमध्ये विजय मिळेल. वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात प्रगतीची नवी दारे उघडतील. या काळात नेतृत्वगुण अधिक बळकट होतील आणि तुमचे व्यक्तिमत्त्व सर्वांना आकर्षित करेल.

advertisement

धनु

धनु राशीसाठी गुरु आणि शुक्राचा अर्धकेंद्र योग भाग्यवर्धक ठरेल. अडथळ्यांमुळे थांबलेली कामे पूर्णत्वाला जातील. नवीन संधी हाताशी येतील, आत्मविश्वास दुप्पट होईल आणि निर्णयक्षमता वाढेल. शिक्षण, नोकरी किंवा परदेश प्रवासासाठी हा काळ अनुकूल ठरेल. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायी आहे. परदेशात करिअर करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांनाही सकारात्मक संकेत मिळतील. प्रवास भविष्यातील यशासाठी नवीन मार्ग खुले करेल.

एकूणच, शारदीय नवरात्रौत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा पर्व असून यंदाच्या ग्रहयोगामुळे वृषभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरेल. आर्थिक प्रगती, वैयक्तिक सुख-समाधान आणि करिअरच्या दृष्टीने मोठी झेप घेण्याची संधी या काळात उपलब्ध होईल. गुरु-शुक्र संयोगाचा प्रभाव साधकांच्या जीवनात नवे यश, मान-सन्मान आणि समाधान घेऊन येईल.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
पुढील ३ दिवसांत गुरु शुक्राची शक्तीशाली युती! 'या' राशींच्या लोकांकडे श्रीमंती येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल