नेमकी घटना काय आहे?
या प्रकरणातील मुख्य आरोपी देवी राम (वय ३२) याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा पुतण्या राकेश हा आरोपीच्या अल्पवयीन मुलीच्या संपर्कात होता. त्याने आरोपीच्या मुलीचे आंघोळ करत असतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ काढले होते. त्यानंतर तो याच फोटो आणि व्हिडिओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करत होता. ही गोष्ट जेव्हा मुलीच्या वडिलांना (देवी राम) समजली, तेव्हा त्यांनी राकेशच्या हत्येचा कट रचला.
advertisement
अशी घडली हत्या
१८ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री देवी रामने राकेशला त्याच्या ग्वाल्हेर महामार्गावरील मिठाईच्या दुकानात बोलावले. राकेश तिथे पोहोचल्यानंतर देवी रामने पाठीमागून त्याच्यावर हल्ला केला. त्याने मफलर आणि लोखंडी तारेने राकेशचा गळा आवळला आणि त्याचा खून केला. त्यानंतर त्याने आपला पुतण्या आणि सह-आरोपी नित्य किशोर याला बोलावले. दोघांनी मिळून राकेशचा मृतदेह एका निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरला.
त्यानंतर एका लोडरमध्ये ड्रम टाकून ते खारी नदीजवळील एका निर्जन भागात गेले. तिथे त्यांनी ड्रम खाली उतरवून त्यावर पेट्रोल ओतले आणि तो पेटवून दिला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी राकेशचा मोबाईल, मफलर आणि लोखंडी तार खारी नदीत फेकून दिले. राकेशची दुचाकी मात्र त्यांनी महामार्गाच्या बाजूलाच ठेवली. त्यानंतर आरोपी देवी राम स्वतः मिठाईचे दुकान बंद करून दिल्लीला पळून गेला. आता अखेर१५ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी आरोपी देवीरामला जगदीशपूर पुलाजवळ अटक केली. अटकेनंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली.