जया बच्चन यांची करण जौहर टॉक शो कॉफी विथ करणमधील एक मुलाखत व्हायरल होतीय. यामध्ये जया यांनी म्हटलं होतं की, अमिताभ बच्चन ऐश्वर्याला सून माननत नाही. हे स्टेटंमेंट सोशल मीडियावर वाऱ्यासारखं फिरत आहे. नेटकरी यावर अनेक प्रतिक्रियाही देत आहेत.
एकेकाळी 500 रुपये कमावणं कठीण अन् आज एका एपिसोडसाठी 25 लाख घेतो 'हा' अभिनेता; किती आहे संपत्ती?
advertisement
व्हायरल होत असलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये जया बच्चन बोलत आहेत, अमित यांच्या आयुष्यात एक पोकळी होती मात्र ती खंत ऐश्वर्यानं भरुन काढली. अमित जी जेव्हा ऐश्वर्याला पाहतात तेव्हा आनंदी होतात. त्यांनी कधी तिला सून मानलं नाही. नेहमीच त्यांनी ऐश्वर्याला आपली मुलगी मानलं आहे. श्वेताचं लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. तिच्या जाण्यनं जी कमी अमितजींना जाणवत होती ती ऐश्वर्यानं भरुन काढली.
दरम्यान, जया यांनी या मुलाखतीत ऐश्वर्याचं कौतुकही केलं होतं. त्यांनी ऐश्वर्याला एक चांगली आई आणि स्ट्रॉंग महिलाही म्हटलं. दरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जातंय. अद्याप यावर दोघांनीही मौन बाळगलंय. त्यामुळे खरंच दोघं घटस्फोट घेणार आहे की फक्त या अफवाच आहेत हे अद्याप स्पष्ट झालं नाही.